शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

तिसऱ्या आघाडीचा राज्यव्यापी प्रभाव अशक्य

By admin | Updated: November 29, 2015 01:58 IST

पणजी : राज्यातील तीन अपक्ष आमदार येत्या जानेवारी महिन्यात तिसरी आघाडी स्थापन करू पाहत आहेत. मात्र, सत्ताधारी

पणजी : राज्यातील तीन अपक्ष आमदार येत्या जानेवारी महिन्यात तिसरी आघाडी स्थापन करू पाहत आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपने अजून हा विषय गंभीरपणे घेतलेला नाही. भाजपचे आमदार विष्णू वाघ यांना तर तिसरी आघाडी राज्यव्यापी प्रभाव निर्माण करू शकणार नाही, असे वाटते. तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या अपक्ष आमदारांच्या निर्णयाकडे भाजप किंवा आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, असे वाघ यांना शनिवारी विचारले असता ते म्हणाले की, तिसरी आघाडी राज्यव्यापी प्रभाव टाकू शकेल असे सध्या तरी आपल्याला वाटत नाही. तीन-चार अपक्ष आमदार एकत्र आले म्हणून तिसरा मोठा राजकीय पक्ष तयार होतो किंवा तिसरा मोठा पर्याय लोकांना प्राप्त होतो, असे होत नाही. दर निवडणुकीवेळी गोव्यात तीन-चार अपक्ष आमदार निवडून येतातच. एका बाजूने राष्ट्रीय पक्ष नको असे म्हणायचे व दुसऱ्या बाजूने स्वत:चा प्रादेशिक पक्ष कोणता तेही सांगायचे नाही, अशी अधांतरी स्थिती तिसऱ्या आघाडीबाबत आहे. वाघ म्हणाले की, तिसरा राजकीय पर्याय लोकांना देण्याची भाषा करणाऱ्या अपक्ष आमदारांकडे ठाम अशी वैचारिक भूमिका मला दिसत नाही. प्रादेशिक पक्षच बरा, राष्ट्रीय पक्ष योग्य नव्हे, अशी भूमिका आता काही अपक्ष आमदार करतात; पण गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी दक्षिण गोव्यात काँग्रेसचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड यांना पाठिंबा दिला होता. रेजिनाल्ड हे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार होते. आपणच आपले हायकमांड व्हावे, असे म्हणायचे व राष्ट्रीय पक्षांना दोष देतानाच मडगावमध्ये दिगंबर कामत या काँग्रेसच्या उमेदवाराशी राजकीय हातमिळवणी करायची, हा मोठा विरोधाभास आहे. म्हणूनच मी म्हणतो की नियोजित तिसऱ्या आघाडीला जन्म देऊ पाहणाऱ्या अपक्ष आमदारांकडे स्पष्ट अशी भूमिका नाही. स्पष्ट अशी वैचारिक मांडणी नाही. आम्ही सगळे याच दृष्टिकोनातून तिसऱ्या आघाडीविषयीच्या घोषणेकडे पाहतो. (प्रतिनिधी)