शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

या ‘दोतोरां’त रुग्णांना दिसतो आणि भेटतो ‘देव’ं!

By admin | Updated: July 25, 2014 01:50 IST

पणजी : ‘नायक दोतोर केन्ना येतलो?’ गोमेकॉत नव्यानेच स्थापन झालेल्या हृदयविकाराच्या सुपरस्पेशालिटी विभागात येऊन एक रुग्ण विचारत होता.

पणजी : ‘नायक दोतोर केन्ना येतलो?’ गोमेकॉत नव्यानेच स्थापन झालेल्या हृदयविकाराच्या सुपरस्पेशालिटी विभागात येऊन एक रुग्ण विचारत होता. नायक डॉक्टर तूर्तास परगावी असून काही दिवसांतच ते परतणार असल्याचे उत्तर त्याला दिले गेले. दरम्यानच्या काळात त्याने इतर चाचण्या करून घ्याव्यात, असेही सांगितले गेले. मात्र ‘ना, नायक दोतोर येतकूच येतां हांव!’ असे प्रत्युत्तर देत तो रुग्ण तेथून निघून गेला. या नायक दोतोराची प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. नायक म्हणजे डॉ. गुरुप्रसाद दत्ता नायक. अमेरिकेत चाललेल्या अफाट प्रॅक्टीसकडे दुर्लक्ष करून आपली सेवा गोमेकॉला देणारा हा निष्णात हृदयरोगतज्ज्ञ अनेकांच्या कृतज्ञतेचा आणि कौतुकाचा विषय ठरतो आहे. असे असले तरी त्यांच्या घरच्यांना मात्र यात विशेष असे काहीच वाटत नाही. याचे कारण म्हणजे लोकाभिमुख वैद्यकसेवा हा शिवोलीच्या नायक घराण्यातील तीन पिढ्यांचा वारसा राहिलेला आहे. आजोबा रामनाथ पंढरीनाथ नायक यांनी दिलेला हा वारसा आता त्यांचा नातू गुरुप्रसाद तितक्याच समर्थपणे पुढे नेतो आहे. रामनाथ नायक यांनी १९२५ पासून डॉक्टरच्या प्रॅक्टीसला प्रारंभ केला. १९२७ साली त्यांना आवश्यक परवाना मिळाला. त्या काळात हिंदू समाजाचे व्यापारउदिमात प्राबल्य होते. साहजिकच वैद्यक शिक्षणासाठी गेलेल्या रामनाथ नायकांची हेटाळणी इतर हिंदू तसेच पोर्तुगीज शिक्षक आणि त्यांचे गावठी हस्तक ‘पोसरो ना रे तुका?’ (पोसरो म्हणजे दुकान) अशा शब्दांत करायचे. अर्थात, या हेटाळणीवर मात करत रामनाथ नायक यांनी जिद्दीने पदवी मिळवली आणि प्रॅक्टीस सुरू केली. वाहनांच्या दुष्काळाचे ते दिवस होते, नायक यांना दुचाकी वा चारचाकी चालवता येत नव्हती. तसे रस्तेही नव्हते. मात्र, त्यांचा रुग्णपरिवार बार्देसमधील हणजूण, कायसूव, आसगाव अशा भागांबरोबरच नदीपल्याड असलेल्या मोरजी, मांद्रे, हरमल, कोरगावपासून पार तेरेखोलपर्यंत पसरला होता. नदी ओलांडून ते एक बैलगाडी करायचे आणि तिच्यात गवत टाकून त्यावर कांबळ पांघरून या भागात फिरायचे. मांद्रेतील एकेकाळची सुप्रसिद्ध चढण आली की बैलगाडी सोडायची आणि पायी प्रवास सुरू व्हायचा. त्या काळातले निष्णात प्रसुती विशारद म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांना अगदी पणजीतल्या प्रतिष्ठितांच्या घराण्यातूनही बोलावणे यायचे. डॉक्टरांची फी पैशांनी देण्याची क्षमता त्या वेळी अवघ्याच रुग्णांच्या ठायी होती; पण नायक यांचे पैशासाठी कधीच अडले नाही. (पान २ वर)