शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

खनिज लिजेस ताब्यात घ्या!

By admin | Updated: June 22, 2014 02:26 IST

पणजी : न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने सर्व खनिज लिजेस सिल करावीत व स्वत:च्या ताब्यात घ्यावीत. बेकायदा व्यवसाय करणाऱ्या खाणमालकांवर

पणजी : न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने सर्व खनिज लिजेस सिल करावीत व स्वत:च्या ताब्यात घ्यावीत. बेकायदा व्यवसाय करणाऱ्या खाणमालकांवर कारवाई करून येणारे पैसे सरकारी तिजोरीत जमा करावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांनी केली. खनिज व्यवसाय बंद असला तरी बेकायदा खनिज व्यवसाय सुरू आहे. सरकार याकडे डोळेझाक करून खनिज व्यावसायिकांना पाठीशी घालत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने लिज ताब्यात घ्यायला हवी होती. सीईसी अहवालाप्रमाणे ३९५ दशलक्ष मेट्रिक टन खनिज निर्यात झाली आहे. सरकारने याचे पैसे खनिजमालकांकडून वसूल करून ट्रकमालकांना व खाणपीडितांना द्यावेत. काँग्रेस सरकारने सर्वच बाजूने लूट चालविली होती. मात्र, भाजपा सरकार बेकायदा गोष्टींना थंडपणे सहकार्य करत असल्याचा आरोप गावस यांनी केला. या विषयात आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. ई-लिलाव हाही घोटाळा असल्याचा आरोपही गावस यांनी केला. विधानसभा निवडणुकांपूर्वी पर्रीकरांनी प्रादेशिक आराखडा, खनिज, पर्यटन योजना, कोमुनिदाद, राज्याला खास दर्जा देणे इत्यादी विषयांवर तत्काळ निर्णय घेण्यात येणार, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी अनेक यू-टर्न घेतले. आता राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने मुख्यमंत्र्यांना तसे करता येणार नाही, असे गावस म्हणाले. अविनाश तावारिस म्हणाले, सरकारने पन्नास हजार नोकऱ्या दिल्या जातील, अशी घोषणा केली. मात्र, सध्या राज्यात सुरू असलेल्या औद्योगिक वसाहतींत मोठ्या व महत्त्वाच्या हुद्यावर बिगर गोमंतकीयांची नियुक्ती करण्यात येते. सरकारने गोमंतकीय युवकांसाठी कशा प्रकारच्या आणि कुठले क्षेत्र आणि विभागात किती नोकऱ्या देण्यात येतील याबाबत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)