शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

प्रधान मुख्य वनपालांना राज्य सरकारचा ‘टाटा’

By admin | Updated: December 29, 2016 02:03 IST

पणजी : वन खात्याचे प्रमुख असलेले प्रधान मुख्य वनपाल अजय सक्सेना यांना वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्याशी गेल्या आठवड्यात

पणजी : वन खात्याचे प्रमुख असलेले प्रधान मुख्य वनपाल अजय सक्सेना यांना वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्याशी गेल्या आठवड्यात सार्वजनिक ठिकाणी झालेला वाद भोवला आहे. प्रधान मुख्य वनपाल सक्सेना यांना गोव्याच्या सेवेतून मुक्त करून दिल्लीला परत पाठवावे, असे सरकारमध्ये ठरले असून त्याबाबतच्या प्रस्तावावर तत्त्वत: निर्णयही झाला आहे. आदेश कोणत्याही क्षणी जारी होईल, असे सूत्रांनी सांगितले. सक्सेना आणि वनमंत्री आर्लेकर यांच्यात गेले काही महिने संघर्ष सुरू होता. सरकारने पाठविलेल्या प्रस्तावांबाबत प्रधान मुख्य वनपाल नकारात्मक भूमिका घेतात, अशा प्रकारची चर्चा वन खात्यात सुरू होती. तथापि, संघर्षाचा स्फोट गेल्या आठवड्यात झाला. आल्तिनो येथे वन भवनाची पायाभरणी करण्याचा सोहळा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर मुख्यमंत्री गेले व वनमंत्री आर्लेकर राहिले. कार्यक्रम संपून परत जाताना आर्लेकर यांनी वन सचिवांच्या उपस्थितीत मुख्य वनपाल सक्सेना यांना काही सूचना केल्या. जे लोक तुम्हाला भेटायला येतात, त्यांना निदान भेटा. दरवेळी स्वत: कामात व्यग्र असल्याचे सांगून लोकांना परत पाठवू नका, असा सल्ला आर्लेकर यांनी दिला. तसेच इतरही काही सूचना केल्या. या वेळी सक्सेना व आर्लेकर यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाचीही झाली. सार्र्वजनिक ठिकाणी वाद एवढा वाढला की, तुम्ही कुणाशी बोलता याची तरी कल्पना आहे काय, अशी विचारणा वनमंत्र्यांनी सक्सेना यांना केली. दुसऱ्या दिवशी मंत्री आर्लेकर यांनी मुख्यमंत्री पार्सेकर यांची भेट घेतली व प्रधान मुख्य वनपालांच्या एकूण वागण्याविषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. पार्सेकर यांनीही स्वत:च्या विविध स्रोतांमार्फत माहिती जमवली व प्रधान मुख्य वनपालांना सेवामुक्त करण्याचे ठरविले. त्याबाबतचा प्रस्ताव वन खात्याकडून शेवटी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मंगळवारी पोहोचला. प्रधान मुख्य वनपाल हे पदही कदाचित रद्द केले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. हे पद प्रथम अस्तित्वातही नव्हते. (खास प्रतिनिधी)