शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

प्रधान मुख्य वनपालांना राज्य सरकारचा ‘टाटा’

By admin | Updated: December 29, 2016 02:03 IST

पणजी : वन खात्याचे प्रमुख असलेले प्रधान मुख्य वनपाल अजय सक्सेना यांना वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्याशी गेल्या आठवड्यात

पणजी : वन खात्याचे प्रमुख असलेले प्रधान मुख्य वनपाल अजय सक्सेना यांना वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्याशी गेल्या आठवड्यात सार्वजनिक ठिकाणी झालेला वाद भोवला आहे. प्रधान मुख्य वनपाल सक्सेना यांना गोव्याच्या सेवेतून मुक्त करून दिल्लीला परत पाठवावे, असे सरकारमध्ये ठरले असून त्याबाबतच्या प्रस्तावावर तत्त्वत: निर्णयही झाला आहे. आदेश कोणत्याही क्षणी जारी होईल, असे सूत्रांनी सांगितले. सक्सेना आणि वनमंत्री आर्लेकर यांच्यात गेले काही महिने संघर्ष सुरू होता. सरकारने पाठविलेल्या प्रस्तावांबाबत प्रधान मुख्य वनपाल नकारात्मक भूमिका घेतात, अशा प्रकारची चर्चा वन खात्यात सुरू होती. तथापि, संघर्षाचा स्फोट गेल्या आठवड्यात झाला. आल्तिनो येथे वन भवनाची पायाभरणी करण्याचा सोहळा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर मुख्यमंत्री गेले व वनमंत्री आर्लेकर राहिले. कार्यक्रम संपून परत जाताना आर्लेकर यांनी वन सचिवांच्या उपस्थितीत मुख्य वनपाल सक्सेना यांना काही सूचना केल्या. जे लोक तुम्हाला भेटायला येतात, त्यांना निदान भेटा. दरवेळी स्वत: कामात व्यग्र असल्याचे सांगून लोकांना परत पाठवू नका, असा सल्ला आर्लेकर यांनी दिला. तसेच इतरही काही सूचना केल्या. या वेळी सक्सेना व आर्लेकर यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाचीही झाली. सार्र्वजनिक ठिकाणी वाद एवढा वाढला की, तुम्ही कुणाशी बोलता याची तरी कल्पना आहे काय, अशी विचारणा वनमंत्र्यांनी सक्सेना यांना केली. दुसऱ्या दिवशी मंत्री आर्लेकर यांनी मुख्यमंत्री पार्सेकर यांची भेट घेतली व प्रधान मुख्य वनपालांच्या एकूण वागण्याविषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. पार्सेकर यांनीही स्वत:च्या विविध स्रोतांमार्फत माहिती जमवली व प्रधान मुख्य वनपालांना सेवामुक्त करण्याचे ठरविले. त्याबाबतचा प्रस्ताव वन खात्याकडून शेवटी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मंगळवारी पोहोचला. प्रधान मुख्य वनपाल हे पदही कदाचित रद्द केले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. हे पद प्रथम अस्तित्वातही नव्हते. (खास प्रतिनिधी)