शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे कृषी धोरण जाहीर; शेतजमिनींचे मुळीच रुपांतरण करू देणार नाही: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 10:33 IST

राज्य सरकारचे अमृतकाल कृषी धोरण-२०२५ जाहीर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्य सरकारचे अमृतकाल कृषी धोरण-२०२५ मंगळवारी जाहीर करण्यात आले. 'शेतजमिनींचे रूपांतरण करू देणार नाही. सांडपाणी शेतांमध्ये सोडणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी कायदा आणणार, तसेच किसान क्रेडिट कार्डाची संख्या वाढवणार,' असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

धोरण जाहीर करण्याच्या कार्यक्रमाला कृषिमंत्री रवी नाईक, फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रेमेंद्र शेट, कृषी खात्याचे सचिव अरुण कुमार मिश्रा, खात्याचे संचालक संदीप फळदेसाई, फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात ५२ हजार नोंदणीकृत शेतकरी आहेत. काही जण लागवड करतात, परंतु अजून त्यानी किसान कार्डे घेतलेली नाहीत. शेतजमिनींचे कोणत्याही प्रकारे भूरूपांतर कर देणार नाही. भातशेती, मरड, खेर किंवा खाजन शेती पूर्णपणे संवर्धित केल्या जातील. शेतीसाठी वापरात असलेल्या विहिरींचे पाणी व्यावसायिक कामांसाठी वापरल्यास कारवाईस करण्यासाठी कडक नियम केले जातील.

शेतकरी गट, ग्रामपंचायती, वैयक्तिक स्तरावर मिळून या धोरणासाठी ३,७५१ सूचना आल्या. सरकारने त्या विचारात घेतलेल्या आहेत. पुढील दहा वर्षांचे ध्येय ठेवून हे धोरण तयार केलेले आहे. शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे, युवक, महिला मोठ्या संख्येने शेतीकडे वळावेत, त्यासाठी प्रयत्न आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्राकृतिक शेतीला चालना, शेतकरी कल्याण निधी मंडळ

मुख्यमंत्री ते पुढे म्हणाले की, 'कम्युनिटी फार्मिंग' अर्थात समूह शेतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. शेती उत्पादन वाढविण्याबरोबरच दर्जेदार कृषी माल मिळावा, यासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे. प्राकृतिक शेतीला चालना दिली जाईल. शेतकरी कल्याण निधी मंडळ स्थापन केले जाईल. शेतकरी जेव्हा संकटात सापडतो, तेव्हा या निधीतून त्याला मदत करता येईल. नवीकरणीय ऊर्जेचा लाभ शेतकऱ्यांना अधिकाधिक व्हावा, यासाठी भर दिलेला आहे. कृषी स्टार्टअपना प्राधान्य दिले जाईल, तसेच आधुनिक तंत्रज्ञान शेती क्षेत्रात आणले जाईल. खाजन शेती पुनर्जीवित करण्यासाठी बांध उभारणे, माती परीक्षण, तसेच इतर उपक्रम हाती घेतले जातील.'

कृषी पर्यटनाला चालना

मुख्यमंत्री म्हणाले की, 'कृषी पर्यटनाला चालना दिली जाईल. किमान ४,००० चौ. मी. क्षेत्रात कृषी पर्यटन सुरू करता येईल. शेतकऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातील. रानटी जनावरे शेती, बागायतीची नासधूस करतात. हे प्रकार रोखण्यासाठी वनखात्याच्या समन्वयाने उपाययोजना हाती घेतल्या जातील. शेतकऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण मिळावे, यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थांशी भागिदारी केली जाईल.

स्पाइस लागवड करण्यास प्राधान्य

मुख्यमंत्री म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सरकार ऊस विकत घेणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही.

पाणीपुरवठा सोसायट्या

सावंत म्हणाले की, 'शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी जलस्रोतांचे व्यवस्थापन केले जाईल. त्यासाठी पाणीपुरवठा सोसायट्यांची स्थापना केली जाईल. शेतकरी कल्याण कायदा आणून शेतकऱ्यांसाठी आश्वासित उदरनिर्वाह सुरक्षा उपलब्ध केली जाईल. मंदिरे चर्च व सोसायट्यांच्या जमिनी सबसिडीसाठी विचारात घेतल्या जातील.'

नारळ, काजू, आंब्यासाठी तीन मंडळे

राज्य सरकार लवकरच नारळ विकास मंडळ, काजू विकास मंडळ आणि आंबा विकास मंडळ अशी तीन मंडळे स्थापन करणार आहे, जेणेकरून या पिकांना भरपूर प्रोत्साहन मिळेल, तसेच बागायतदारांच्या समस्याही सुटतील. गोवा कृषी वारसा म्युझियमही स्थापन केले जाईल. काजू, आंबा, सुपारी याबरोबरच आवाकाडो, ग्रेपफ्रूट आर्दीना आधारभूत दर दिला जाईल.'

कृषी पर्यटनासाठी स्पाइस (मसाला) लागवडीस प्राधान्य दिले जाईल.

सांडपाणी शेतांमध्ये सोडणाऱ्यांवर कडक कारवाई

शेतीसाठी पाणीपुरवठा सोसायट्या

शेतकरी कल्याण निधी मंडळ स्थापणार

प्राकृतिक शेतीला चालना देणार

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी