शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

दहावीचा निकाल ८५.१५ टक्के

By admin | Updated: May 24, 2015 01:18 IST

पणजी : शालान्त मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८५.१५ टक्के लागला असून यशाची परंपरा कायम राखताना मुलींनी उत्तीर्ण टक्केवारीत

पणजी : शालान्त मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८५.१५ टक्के लागला असून यशाची परंपरा कायम राखताना मुलींनी उत्तीर्ण टक्केवारीत आणि सर्वाधिक गुण घेण्याच्या बाबतीत मुलांवर मात केली. एकूण ७६ विद्यालयांचा ९५ ते १०० टक्के निकाल लागला असून अशी कामगिरी ३७ विद्यालयांनी सलग दोन वर्षे केली आहेत.एकूण १९५८२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १६७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.३० इतकी आहे, ८९.१५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण २४ केंद्रांत परीक्षा झाली होती. त्यात सर्वाधिक निकाल म्हापसा केंद्रात ९०.८३ टक्के, तर सर्वांत कमी निकाल ७२.६० टक्के लागला. क्रीडा गुणांचा लाभ यंदा ७६२१ विद्यार्थ्यांना झाला. त्यातील ५०७ विद्यार्थी केवळ क्रीडा गुणांमुळे उत्तीर्ण होऊ शकले. म्हणजेच २.५९ टक्के विद्यार्थी क्रीडागुणांमुळे उत्तीर्ण झाले.काही कठीण वाटणारे विषय सोडून त्याऐवजी पूर्व व्यावसायिक विभागातील सोपे विषय घेऊन परीक्षा देण्याची सुविधा शालान्त मंडळाने दिली आहे. अशा एकूण २८० विद्यार्थ्यांपैकी २२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष मुलांच्या गटात १९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील ५२ जण विशेष शाळेतील, तर १४७ जण नियमित विद्यालयातील होते. एकूण ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (प्रतिनिधी)