शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

आश्वासनांवर बोळवण

By admin | Updated: June 15, 2014 01:18 IST

पणजी : गोव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक प्रकारच्या घोषणा करतील, असे अपेक्षित होते; पण प्रत्यक्षात वरवरची आश्वासने तेवढी गोमंतकीयांना मोदी यांच्याकडून ऐकायला मिळाली.

पणजी : गोव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक प्रकारच्या घोषणा करतील, असे अपेक्षित होते; पण प्रत्यक्षात वरवरची आश्वासने तेवढी गोमंतकीयांना मोदी यांच्याकडून ऐकायला मिळाली. गोव्याला खास दर्जा, दुहेरी नागरिकत्वाच्या तिढ्यावर तोडगा किंवा राज्याला मायनिंग पॅकेज देण्याविषयी पंतप्रधानांनी काहीच आश्वासन दिले नाही. खाण व्यवसाय नव्याने सुरू करणे, जुवारी नदीवर पूल बांधणे या केवळ दोन विषयांबाबत पंतप्रधानांनी वरवरची आश्वासने देत बोळवण केली. गोव्याबाबत आपल्याला असलेले प्रेम तेवढे त्यांनी बोलून दाखवत गोव्याला कोणत्याही बाबतीत पाठिंबा देऊ, असे विधान केले. त्यामुळे गोमंतकीयांना ‘अच्छे दिन’साठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. गोव्याबाबत अनेक महत्त्वाच्या घोषणा प्रत्यक्ष पंतप्रधानांकडूनच ऐकायला मिळतील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही चार दिवसांपूर्वी म्हटले होते. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर गोव्याला खास दर्जा निश्चितच मिळेल, अशा प्रकारची हवा तयार केली गेली होती. पंतप्रधान गोवा भेटीवर आल्यानंतर खास दर्जाच्या गोमंतकीयाच्या मागणीविषयी भाष्य करतील, गोव्यातील खनिज व्यवसाय लगेच सुरू करण्याविषयी ठोस असे एखादे विधान करतील, असे अपेक्षित होते. मात्र, खास दर्जाबाबत ते काहीच बोलले नाहीत. गोव्यातील समस्यांची आपल्याला जाण असून खाण व्यवसाय लवकर सुरू व्हावा म्हणून विविध खात्यांना आपण सूचना केल्या आहेत, एवढेच मोदी म्हणाले. गोव्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने गोव्याला विशेष मायनिंग पॅकेज दिले जाईल, खाणग्रस्त भागातील लोकांची कर्जे रिझर्व्ह बँकेकडून माफ केली जावीत, या दृष्टिकोनातून मोदी काही तरी बोलतील, असेही लोकांना वाटत होते; पण त्या विषयांना पंतप्रधानांनी स्पर्शही केला नाही. त्यामुळे त्याबाबत अपेक्षाभंगच वाट्याला आला. पंतप्रधानांचे गोव्यात चार सोहळे पार पडले. सर्व ठिकाणी मोदी गोव्याविषयी फक्त मोघमपणे बोलले. त्यात एकही ठोस आश्वासन नव्हते. (खास प्रतिनिधी)