शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सात खाण लिजांचीच अतिक्रमणे!

By admin | Updated: December 2, 2015 01:29 IST

पणजी : राज्यातील ३६ खनिज लिजधारकांनी खंदकांवर अतिक्रमण केले असल्याचा शहा आयोगाच्या चौकशी अहवालातून

पणजी : राज्यातील ३६ खनिज लिजधारकांनी खंदकांवर अतिक्रमण केले असल्याचा शहा आयोगाच्या चौकशी अहवालातून केला गेलेला दावा खाण खात्याने अमान्य केला आहे. फक्त सात लिजांबाबत खाण खात्याला प्रथमदर्शनी अतिक्रमण आढळून आले व त्या सातपैकी तीन लिजांना काही महिन्यांपूर्वी दुहेरी नूतनीकरण करून देण्यात आले आहे. गोवा फाउंडेशन संस्थेच्या याचिकेच्या अनुषंगाने खाण खात्याकडून सर्वोच्च न्यायालयास सोमवारी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. याचिकादार असलेल्या गोवा फाउंडेशन संस्थेचे व आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांचेही अनेक दावे व आरोप या प्रतिज्ञापत्रातून फेटाळून लावण्यात आले आहेत. गोवा फाउंडेशन संस्था तर राज्यातील सर्वच प्रकल्पांविरुद्ध याचिका सादर करत असून राज्याच्या विकासात अडथळा निर्माण करत आहे. या संस्थेचा वेगळाच अजेंडा दिसून येतो, असे खाण खात्याने म्हटले आहे. खाण खात्याने जीपीएस पद्धतीने सर्वेक्षण करून पाहिले व त्या वेळी प्रथमदर्शनी सात लिजधारकांनी अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले. त्या सातपैकी तिघांना लिजांचे नूतनीकरण करून दिले; कारण त्यांचे अतिक्रमण हे १० टक्क्यांपेक्षाही खूप कमी आहे. आर. एस. शेट्ये, गीताबाई परुळेकर व हिरालाल या तीन कंपन्यांचे अतिक्रमण हे अनुक्रमे १.२३ हेक्टर, ०.२ हेक्टर व १.१ हेक्टर आहे. सातही लिजधारकांना यापूर्वी कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या असून त्यांच्याविषयी सुनावणीही घेतली जाईल, असे खात्याने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. खाण खात्याने सर्व ४०० अर्जदारांच्या लिजांचे नूतनीकरण केले नाही. फक्त ८८ लिजांचे नूतनीकरण केले. त्या सर्वांचे मायनिंग प्लॅन आयबीएमने मंजूर केले आहेत. आयबीएमने एखाद्या (पान २ वर)