शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

बहुतांश खनिज लिजांचे मार्चपर्यंत नूतनीकरण

By admin | Updated: January 4, 2015 02:29 IST

पणजी : येत्या मार्चपर्यंत राज्यातील ८० पैकी बहुतांश खनिज लिजांचे नूतनीकरण करण्याचे सरकारने तत्त्वत: ठरविले आहे. २०१२ साली खाणबंदी लागू झाली त्या वेळी ८० खनिज खाणी सुरू होत्या.

पणजी : येत्या मार्चपर्यंत राज्यातील ८० पैकी बहुतांश खनिज लिजांचे नूतनीकरण करण्याचे सरकारने तत्त्वत: ठरविले आहे. २०१२ साली खाणबंदी लागू झाली त्या वेळी ८० खनिज खाणी सुरू होत्या. ज्या खनिज लिजांचे क्षेत्र अभयारण्यांच्या बाहेर आहे आणि ज्या लिजांबाबत कमी प्रमाणात नियमांचा भंग यापूर्वी झाला आहे, अशा लिजांचे नूतनीकरण करून देण्याची सरकारची भूमिका आहे, असे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत सतरा खनिज लिजांचे नूतनीकरण सरकारने केले आहे. लिज करारावरही सह्या झाल्या आहेत. यापुढे आणखी वीस खनिज लिजांचे नूतनीकरण होणार आहे. सरकारला लिजांचे नूतनीकरण केल्याने मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत आहे; पण लिज नूतनीकरण केले गेले तरी, प्रत्यक्षात खाणी सुरू होण्यास विलंब लागेल. नूतनीकरण झालेल्या खाणींपैकी एकही खनिज खाण अजून सुरू होऊ शकलेली नाही. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडून पर्यावरणविषयक (ईसी) दाखला मिळाल्यानंतरच खनिज खाणी सुरू होणार आहेत. या पुढील जून-जुलैचा पावसाळी मोसमही निघून जाईल व त्यानंतर खनिज खाणी सुरू होऊ शकतात, असे राज्यातील खनिज व्यावसायिकांना वाटते. गोव्याचा खाण व्यवसाय कसा सुरू करावा याविषयी केंद्रीय स्तरावरही स्पष्टता नाही, असा अनुभव गोव्यातील खाणमालकांना येत आहे. (खास प्रतिनिधी)