शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक आराखडा खुला

By admin | Updated: December 2, 2015 01:28 IST

पणजी : राज्याचा बहुचर्चित २०२१चा गोवा प्रादेशिक आराखडा अखेर मंगळवारी (दि.१) सरकारने खुला केला.

पणजी : राज्याचा बहुचर्चित २०२१चा गोवा प्रादेशिक आराखडा अखेर मंगळवारी (दि.१) सरकारने खुला केला. लोकांच्या सूचना व आक्षेपांनुसार आराखड्यात दुरुस्त्या करायच्या असल्याने मंगळवारपासून एकूण ३० दिवसांची मुदत लोकांना सरकारने दिली आहे. सर्व तालुक्यांचे आराखडे खुले करण्यात आले आहेत. नगर नियोजन खात्याच्या तिसवाडी, पेडणे, डिचोली, फोंडा, मुरगाव, केपे व काणकोण येथील तालुका पातळीवरील कार्यालयांमध्ये तसेच म्हापसा व मडगाव येथील जिल्हास्तरावरील कार्यालयांमध्ये आराखडे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, असे मुख्य नगर नियोजक एस. टी. पुत्तुराजू यांनी जाहीर केले आहे. २०२१चा प्रादेशिक आराखडा दिगंबर कामत सरकार अधिकारावर असताना तज्ज्ञांकडून तयार करून घेण्यात आला होता. तथापि, हा आराखडा राज्याचे हित पाहणारा नाही, असा आरोप विधानसभा निवडणुकीवेळी करून भाजपने तो आराखडा रद्द करण्याची मागणी केली होती. राज्याला नवा आराखडा देण्याची ग्वाही दिली होती. तथापि, सरकारने हा आराखडा रद्द न करता त्यात सुधारणा कराव्यात, अशी नवी भूमिका घेतली. हा आराखडा सुधारणांसाठी लवकर खुला करा, अशी मागणी ‘गोवा बचाव अभियान’ गेली तीन वर्षे करत होते. शेवटी आता साडेतीन वर्षांनंतर सरकारने आराखडा खुला केला आहे. बार्देस आणि सासष्टी तालुक्याच्या आराखड्याबाबत जास्त वाद आहे. यापूर्वी आराखड्यांबाबत सुमारे साडेतीन हजार सूचना तथा तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्यांनी नव्याने अर्ज करण्याची गरज नाही, असे नगर नियोजन खात्याने म्हटले आहे. खात्याने प्रकाशित केलेल्या यादीत ज्यांची नावे आलेली नसतील, त्यांनी त्यांची मते व सूचना पुन्हा सादर कराव्यात, असेही पुत्तुराजू यांनी म्हटले आहे. २०२१चा आराखडा पर्रीकर सरकारने ४ जून २०१२ रोजी स्थगित केला होता. राज्यातील अनेक बिल्डरांचे व राजकारण्यांचेही लक्ष आराखडा कधी खुला होतो, याकडे लागून होते. आता विविध ठिकाणी सेटलमेंट झोन, कमर्शिअल झोन अस्तित्वात आणण्याचे तसेच एफएआर वाढवून मिळण्यासाठी धडपड करण्याचे प्रयत्न बिल्डरांकडून केले जाण्याची दाट शक्यता आहे. ताळगाव व म्हापशाचे ओडीपी वादग्रस्त ठरत असतानाच सरकार आता पणजीचाही ओडीपी खुला करणार आहे. याच स्थितीत आराखडाही खुला झाल्यामुळे पर्यावरण, शेतजमिनी, जलसाठे यांच्या हितरक्षणाविषयी दक्ष असलेल्या एनजीओंची जबाबदारी वाढली आहे. (खास प्रतिनिधी)