शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

प्रादेशिक आराखडा खुला

By admin | Updated: December 2, 2015 01:28 IST

पणजी : राज्याचा बहुचर्चित २०२१चा गोवा प्रादेशिक आराखडा अखेर मंगळवारी (दि.१) सरकारने खुला केला.

पणजी : राज्याचा बहुचर्चित २०२१चा गोवा प्रादेशिक आराखडा अखेर मंगळवारी (दि.१) सरकारने खुला केला. लोकांच्या सूचना व आक्षेपांनुसार आराखड्यात दुरुस्त्या करायच्या असल्याने मंगळवारपासून एकूण ३० दिवसांची मुदत लोकांना सरकारने दिली आहे. सर्व तालुक्यांचे आराखडे खुले करण्यात आले आहेत. नगर नियोजन खात्याच्या तिसवाडी, पेडणे, डिचोली, फोंडा, मुरगाव, केपे व काणकोण येथील तालुका पातळीवरील कार्यालयांमध्ये तसेच म्हापसा व मडगाव येथील जिल्हास्तरावरील कार्यालयांमध्ये आराखडे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, असे मुख्य नगर नियोजक एस. टी. पुत्तुराजू यांनी जाहीर केले आहे. २०२१चा प्रादेशिक आराखडा दिगंबर कामत सरकार अधिकारावर असताना तज्ज्ञांकडून तयार करून घेण्यात आला होता. तथापि, हा आराखडा राज्याचे हित पाहणारा नाही, असा आरोप विधानसभा निवडणुकीवेळी करून भाजपने तो आराखडा रद्द करण्याची मागणी केली होती. राज्याला नवा आराखडा देण्याची ग्वाही दिली होती. तथापि, सरकारने हा आराखडा रद्द न करता त्यात सुधारणा कराव्यात, अशी नवी भूमिका घेतली. हा आराखडा सुधारणांसाठी लवकर खुला करा, अशी मागणी ‘गोवा बचाव अभियान’ गेली तीन वर्षे करत होते. शेवटी आता साडेतीन वर्षांनंतर सरकारने आराखडा खुला केला आहे. बार्देस आणि सासष्टी तालुक्याच्या आराखड्याबाबत जास्त वाद आहे. यापूर्वी आराखड्यांबाबत सुमारे साडेतीन हजार सूचना तथा तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्यांनी नव्याने अर्ज करण्याची गरज नाही, असे नगर नियोजन खात्याने म्हटले आहे. खात्याने प्रकाशित केलेल्या यादीत ज्यांची नावे आलेली नसतील, त्यांनी त्यांची मते व सूचना पुन्हा सादर कराव्यात, असेही पुत्तुराजू यांनी म्हटले आहे. २०२१चा आराखडा पर्रीकर सरकारने ४ जून २०१२ रोजी स्थगित केला होता. राज्यातील अनेक बिल्डरांचे व राजकारण्यांचेही लक्ष आराखडा कधी खुला होतो, याकडे लागून होते. आता विविध ठिकाणी सेटलमेंट झोन, कमर्शिअल झोन अस्तित्वात आणण्याचे तसेच एफएआर वाढवून मिळण्यासाठी धडपड करण्याचे प्रयत्न बिल्डरांकडून केले जाण्याची दाट शक्यता आहे. ताळगाव व म्हापशाचे ओडीपी वादग्रस्त ठरत असतानाच सरकार आता पणजीचाही ओडीपी खुला करणार आहे. याच स्थितीत आराखडाही खुला झाल्यामुळे पर्यावरण, शेतजमिनी, जलसाठे यांच्या हितरक्षणाविषयी दक्ष असलेल्या एनजीओंची जबाबदारी वाढली आहे. (खास प्रतिनिधी)