शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

पाऊस गेला; गारवा कायम

By admin | Updated: March 4, 2015 01:57 IST

पणजी : हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे देशाच्या इतर भागाबरोबरच गोव्यातही झालेली पर्जन्यवृष्टी बंद झाली असली,

पणजी : हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे देशाच्या इतर भागाबरोबरच गोव्यातही झालेली पर्जन्यवृष्टी बंद झाली असली, तरी त्यामुळे निर्माण झालेला गारवा अद्याप कायम आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही हिवाळा वाटावा असे वातावरण आहे. अरबी समुद्रात अचानक झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्रसपाटीपासून २ किलोमीटर उंचीवर हवामानात वेगवान बदल घडून रविवारी देशात अनेक ठिकाणी पाऊस कोसळला होता. गोव्यातही काही ठिकाणी पावसाच्या हलक्या व काही ठिकाणी मोठ्या सरी कोसळल्या होत्या. वायव्य दिशेहून किनारपट्टीच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याने हा पाऊस आणला होता. दोन दिवसांत परिस्थितीत कमालीची सुधारणा झाल्याची माहिती हवामान खात्याचे शास्त्रज्ञ एन. हरिदासन यांनी दिली. आता पावसाची शक्यता राहिली नाही; परंतु हवामानातील बदलानंतर उत्तरेकडून वारा सुटला आहे. उत्तर भारतात बर्फ वर्षाव सुरू असल्यामुळे हा वारा थंडी घेऊन येतो, असे हरिदासन यांनी सांगितले. राज्याचे मंगळवारी किमान तापमान हे सामान्य तापमानापेक्षा ३ अंश सेल्सियस खाली आले होते. म्हणजे १९.३ अंश सेल्सियस एवढे झाले होते. कमाल तापमानही सामान्य तापमानापेक्षा १ अंशने खाली म्हणजे ३१.३ अंश सेल्सियस एवढे नोंद झाले होते. त्यामुळे सकाळी थंडी होतीच, शिवाय दुपारीही गारवा जाणवत होता. (प्रतिनिधी)