शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस गेला; गारवा कायम

By admin | Updated: March 4, 2015 01:57 IST

पणजी : हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे देशाच्या इतर भागाबरोबरच गोव्यातही झालेली पर्जन्यवृष्टी बंद झाली असली,

पणजी : हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे देशाच्या इतर भागाबरोबरच गोव्यातही झालेली पर्जन्यवृष्टी बंद झाली असली, तरी त्यामुळे निर्माण झालेला गारवा अद्याप कायम आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही हिवाळा वाटावा असे वातावरण आहे. अरबी समुद्रात अचानक झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्रसपाटीपासून २ किलोमीटर उंचीवर हवामानात वेगवान बदल घडून रविवारी देशात अनेक ठिकाणी पाऊस कोसळला होता. गोव्यातही काही ठिकाणी पावसाच्या हलक्या व काही ठिकाणी मोठ्या सरी कोसळल्या होत्या. वायव्य दिशेहून किनारपट्टीच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याने हा पाऊस आणला होता. दोन दिवसांत परिस्थितीत कमालीची सुधारणा झाल्याची माहिती हवामान खात्याचे शास्त्रज्ञ एन. हरिदासन यांनी दिली. आता पावसाची शक्यता राहिली नाही; परंतु हवामानातील बदलानंतर उत्तरेकडून वारा सुटला आहे. उत्तर भारतात बर्फ वर्षाव सुरू असल्यामुळे हा वारा थंडी घेऊन येतो, असे हरिदासन यांनी सांगितले. राज्याचे मंगळवारी किमान तापमान हे सामान्य तापमानापेक्षा ३ अंश सेल्सियस खाली आले होते. म्हणजे १९.३ अंश सेल्सियस एवढे झाले होते. कमाल तापमानही सामान्य तापमानापेक्षा १ अंशने खाली म्हणजे ३१.३ अंश सेल्सियस एवढे नोंद झाले होते. त्यामुळे सकाळी थंडी होतीच, शिवाय दुपारीही गारवा जाणवत होता. (प्रतिनिधी)