शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

खाणप्रश्नी पंतप्रधानांनी अहवाल मागितला, अर्थसंकल्पातून धोरण मांडू- पर्रिकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 21:33 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ानंतर आर्थिकदृष्टय़ा गोव्यावर कोणता परिणाम होत आहे याविषयीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर करावा, अशा प्रकारची सूचना आपल्याला पंतप्रधानांकडून आल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी येथे सांगितले.

पणजी - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ानंतर आर्थिकदृष्टय़ा गोव्यावर कोणता परिणाम होत आहे याविषयीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर करावा, अशा प्रकारची सूचना आपल्याला पंतप्रधानांकडून आल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी येथे सांगितले. आपण सर्व राजकीय पक्ष, आमदार आणि विविध घटकांशी खाणप्रश्नी बोलेन व येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सरकारचे अंतिम धोरण जाहीर करीन, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

पत्रकारांशी बोलताना पर्रिकर म्हणाले, की न्यायालयीन निवाडय़ानंतर दुस-याच दिवशी आपल्याला पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि खनिज खाणप्रश्नी विचारणा करण्यात आली. निवाडय़ाचा आर्थिकदृष्टय़ा राज्यावर कसा परिणाम होईल, हे आपल्याला विचारले गेले. अहवाल पाठवून द्या व गरज असल्यास नंतर पंतप्रधानांना भेटा असा सल्ला आपल्याला दिला गेला. पंतप्रधानांचे गोव्याकडे लक्ष आहे असा त्याचा अर्थ होतो.

मुख्यमंत्री म्हणाले, की खनिज खाणींचा लिलाव करणार की आणखी काय करणार ते आपण सर्वाशी चर्चा केल्यानंतर ठरवीन. आपण आमदारांशीही बोलेन. सरकारी महामंडळ स्थापन करून त्याद्वारे खाणी चालविण्याची पद्धत नको हे आपले व्यक्तीगत मत आहे. तो आपला निर्णय नव्हे. सरकारी महामंडळांचा कारभार कसा चालतो ते सर्वानीच पाहिले आहे. तीन पद्धतीने खाणप्रश्नी उपाययोजना करण्याचा विचार करता येईल. तत्काळ, तात्पुरती व दूरगामी उपाययोजना विचारात घ्यावी लागेल. प्रसार माध्यमांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनार्पयत थांबावे.  आम्ही अंतिम निर्णयाप्रत येऊ व खाणप्रश्न सोडवू.

मुख्यमंत्री म्हणाले, की दि. 15 मार्चर्पयत तरी खाण कंपन्या खनिज माल काढू शकतील. दि. 31 मेर्पयत ह्या मालाचा व्यवसाय करता येईल. सरकारच्या ताब्यातील जो खनिज माल आहे, त्याचा ई लिलाव पुकारला जाईल. या सर्व उपक्रमांमुळे या खाण मोसमाची काळजी घेतली जाईल. 

दरम्यान, दक्षिण गोव्यातील साळ नदी सर्वार्थाने स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने 6 कोटी लाखांचा निधी मंजुर केला आहे. कालच्या सोमवारीच आपल्याला केंद्रीय मंत्र्यांकडून त्याविषयीचे पत्र मिळाले. गोवा सरकार राज्यभर 7  हजार शौचालयांचे बांधकाम करणार आहे. एवढय़ा कुटूंबांना शौचालयांची गरज आहे ही वस्तूस्थिती आहे. अभयारण्यांमध्ये राहणा-या लोकांसाठी शौचालये बांधून देता येत नाहीत. तथापि, त्यावरही योग्य ती उपाययोजना वनविषयक कायद्यांनुसार केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर