शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

खाणप्रश्नी पंतप्रधानांनी अहवाल मागितला, अर्थसंकल्पातून धोरण मांडू- पर्रिकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 21:33 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ानंतर आर्थिकदृष्टय़ा गोव्यावर कोणता परिणाम होत आहे याविषयीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर करावा, अशा प्रकारची सूचना आपल्याला पंतप्रधानांकडून आल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी येथे सांगितले.

पणजी - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ानंतर आर्थिकदृष्टय़ा गोव्यावर कोणता परिणाम होत आहे याविषयीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर करावा, अशा प्रकारची सूचना आपल्याला पंतप्रधानांकडून आल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी येथे सांगितले. आपण सर्व राजकीय पक्ष, आमदार आणि विविध घटकांशी खाणप्रश्नी बोलेन व येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सरकारचे अंतिम धोरण जाहीर करीन, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

पत्रकारांशी बोलताना पर्रिकर म्हणाले, की न्यायालयीन निवाडय़ानंतर दुस-याच दिवशी आपल्याला पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि खनिज खाणप्रश्नी विचारणा करण्यात आली. निवाडय़ाचा आर्थिकदृष्टय़ा राज्यावर कसा परिणाम होईल, हे आपल्याला विचारले गेले. अहवाल पाठवून द्या व गरज असल्यास नंतर पंतप्रधानांना भेटा असा सल्ला आपल्याला दिला गेला. पंतप्रधानांचे गोव्याकडे लक्ष आहे असा त्याचा अर्थ होतो.

मुख्यमंत्री म्हणाले, की खनिज खाणींचा लिलाव करणार की आणखी काय करणार ते आपण सर्वाशी चर्चा केल्यानंतर ठरवीन. आपण आमदारांशीही बोलेन. सरकारी महामंडळ स्थापन करून त्याद्वारे खाणी चालविण्याची पद्धत नको हे आपले व्यक्तीगत मत आहे. तो आपला निर्णय नव्हे. सरकारी महामंडळांचा कारभार कसा चालतो ते सर्वानीच पाहिले आहे. तीन पद्धतीने खाणप्रश्नी उपाययोजना करण्याचा विचार करता येईल. तत्काळ, तात्पुरती व दूरगामी उपाययोजना विचारात घ्यावी लागेल. प्रसार माध्यमांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनार्पयत थांबावे.  आम्ही अंतिम निर्णयाप्रत येऊ व खाणप्रश्न सोडवू.

मुख्यमंत्री म्हणाले, की दि. 15 मार्चर्पयत तरी खाण कंपन्या खनिज माल काढू शकतील. दि. 31 मेर्पयत ह्या मालाचा व्यवसाय करता येईल. सरकारच्या ताब्यातील जो खनिज माल आहे, त्याचा ई लिलाव पुकारला जाईल. या सर्व उपक्रमांमुळे या खाण मोसमाची काळजी घेतली जाईल. 

दरम्यान, दक्षिण गोव्यातील साळ नदी सर्वार्थाने स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने 6 कोटी लाखांचा निधी मंजुर केला आहे. कालच्या सोमवारीच आपल्याला केंद्रीय मंत्र्यांकडून त्याविषयीचे पत्र मिळाले. गोवा सरकार राज्यभर 7  हजार शौचालयांचे बांधकाम करणार आहे. एवढय़ा कुटूंबांना शौचालयांची गरज आहे ही वस्तूस्थिती आहे. अभयारण्यांमध्ये राहणा-या लोकांसाठी शौचालये बांधून देता येत नाहीत. तथापि, त्यावरही योग्य ती उपाययोजना वनविषयक कायद्यांनुसार केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर