शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जायंट किलर ठरल्याचा अभिमान : दयानंद सोपटे

By admin | Updated: March 11, 2017 19:51 IST

गोव्याच्या इतिहासात मी जायंट किलर ठरल्याचा अभिमान असल्याचे काँग्रेसचे मांद्रे विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार दयानंद सोपटे

निवृत्ती शिरोडकर :

मांद्रे (गोवा) : गोव्याच्या इतिहासात मी जायंट किलर ठरल्याचा अभिमान असल्याचे काँग्रेसचे मांद्रे विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार दयानंद सोपटे यांनी विजयानंतर विलक्षण जोशात सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा दारुण पराभव केल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. विजयानंतर सोपटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी मांद्रे मतदारसंघात नवा होतो, तेव्हाही पाच वर्षांपूर्वी फाईट दिली होती. एक हजार मतांचा फरक होता. आता मात्र गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव मी केल्याने खूप आनंद झाला. विजयाचे श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना जाते, त्यांनी आणि जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला, अशा शब्दांत सोपटे यांनी भावना व्यक्त केल्या. आनंदाचे भरते आल्याचे त्यांची देहबोली सांगत होती. पार्सेकर यांनी या निवडणुकीत १0 कोटी खर्च केल्याचा आरोप सोपटे यांनी केला. ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला उमेदवार म्हणून ९ हजार मतेही ओलांडता आली नाहीत.

२0१२ च्या निवडणुकीतच मी निवडून येणार होतो; परंतु त्या वेळी स्वकीयांनीच घात केला. काँग्रेसच्या नेत्यांनीच त्या वेळी विरोधात काम केले. माझ्यासाठी न वावरता ते गप्प जरी बसले असते तरी मी त्या वेळी निवडून आलो असतो. मांद्रेत मी त्या वेळी नवा होतो. गेल्या १७ वर्षांत माणसे जोडली त्याचे फळ आता मिळाले. चौकटी काँग्रेसची एकी मांद्रेतून कॉँग्रेसचा विजय त्या वेळीच निश्चित झाला होता, ज्या वेळी निवडणूक जाहीर होऊन सर्व इच्छुक कॉँग्रेस नेते केवळ मुख्यमंत्र्यांना घरी पाठवायचे हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून एकत्रित आले होते. कॉँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दयानंद सोपटे यांच्या विजयासाठी तहान-भूक विसरून काम केले आणि नवा इतिहास घडविला. कॉँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे बंडखोरी झालेली नाही.

पराभवाची काही कारणे अशी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव होण्यासाठी अनेक कारण आहेत. त्यातील मांद्रे कॉलेजवर केलेला अन्याय, सीआरझेड विषय, शॅक व्यावसायिकांवर परवाने देताना अन्याय, केरी-तेरेखोल जमीन विक्री, लिडिंग हॉटेल प्रकल्प, तेरेखोल नदीत बेकायदा ड्रेजिंग, बेरोजगारी, शासकीय नोकऱ्या ठराविक समाजाच्या लोकांनाच प्राधान्यक्रमाने देणे, नोकरी मागायला गेलेल्यांचा अपमान करणे या अनेक कारणांमुळे मुख्यमंत्र्यांवर मांद्रेवासीय नाराज होते. मुख्यमंत्री बनल्यानंतरच्या काळात तर मतदारसंघासाठी वेळच दिला नाही, हेही एक कारण आहे.