शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

जायंट किलर ठरल्याचा अभिमान : दयानंद सोपटे

By admin | Updated: March 11, 2017 19:51 IST

गोव्याच्या इतिहासात मी जायंट किलर ठरल्याचा अभिमान असल्याचे काँग्रेसचे मांद्रे विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार दयानंद सोपटे

निवृत्ती शिरोडकर :

मांद्रे (गोवा) : गोव्याच्या इतिहासात मी जायंट किलर ठरल्याचा अभिमान असल्याचे काँग्रेसचे मांद्रे विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार दयानंद सोपटे यांनी विजयानंतर विलक्षण जोशात सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा दारुण पराभव केल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. विजयानंतर सोपटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी मांद्रे मतदारसंघात नवा होतो, तेव्हाही पाच वर्षांपूर्वी फाईट दिली होती. एक हजार मतांचा फरक होता. आता मात्र गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव मी केल्याने खूप आनंद झाला. विजयाचे श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना जाते, त्यांनी आणि जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला, अशा शब्दांत सोपटे यांनी भावना व्यक्त केल्या. आनंदाचे भरते आल्याचे त्यांची देहबोली सांगत होती. पार्सेकर यांनी या निवडणुकीत १0 कोटी खर्च केल्याचा आरोप सोपटे यांनी केला. ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला उमेदवार म्हणून ९ हजार मतेही ओलांडता आली नाहीत.

२0१२ च्या निवडणुकीतच मी निवडून येणार होतो; परंतु त्या वेळी स्वकीयांनीच घात केला. काँग्रेसच्या नेत्यांनीच त्या वेळी विरोधात काम केले. माझ्यासाठी न वावरता ते गप्प जरी बसले असते तरी मी त्या वेळी निवडून आलो असतो. मांद्रेत मी त्या वेळी नवा होतो. गेल्या १७ वर्षांत माणसे जोडली त्याचे फळ आता मिळाले. चौकटी काँग्रेसची एकी मांद्रेतून कॉँग्रेसचा विजय त्या वेळीच निश्चित झाला होता, ज्या वेळी निवडणूक जाहीर होऊन सर्व इच्छुक कॉँग्रेस नेते केवळ मुख्यमंत्र्यांना घरी पाठवायचे हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून एकत्रित आले होते. कॉँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दयानंद सोपटे यांच्या विजयासाठी तहान-भूक विसरून काम केले आणि नवा इतिहास घडविला. कॉँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे बंडखोरी झालेली नाही.

पराभवाची काही कारणे अशी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव होण्यासाठी अनेक कारण आहेत. त्यातील मांद्रे कॉलेजवर केलेला अन्याय, सीआरझेड विषय, शॅक व्यावसायिकांवर परवाने देताना अन्याय, केरी-तेरेखोल जमीन विक्री, लिडिंग हॉटेल प्रकल्प, तेरेखोल नदीत बेकायदा ड्रेजिंग, बेरोजगारी, शासकीय नोकऱ्या ठराविक समाजाच्या लोकांनाच प्राधान्यक्रमाने देणे, नोकरी मागायला गेलेल्यांचा अपमान करणे या अनेक कारणांमुळे मुख्यमंत्र्यांवर मांद्रेवासीय नाराज होते. मुख्यमंत्री बनल्यानंतरच्या काळात तर मतदारसंघासाठी वेळच दिला नाही, हेही एक कारण आहे.