शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

पोलीस स्थानकांत हवा बाल तक्रार विभाग

By admin | Updated: August 23, 2015 02:04 IST

पणजी : राज्यात अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात खास बाल तक्रार विभाग स्थापन करण्यात यावा

पणजी : राज्यात अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात खास बाल तक्रार विभाग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी कळंगुट बाल ग्राम समितीच्या बैठकीत झाली. राज्यातील समुद्रकिनारी परिसरात मोठ्या प्रमाणात बालमजुरी चालते. यात परप्रांतीय मुलांबरोबरच स्थानिक मुलांचाही समावेश आहे. बालमजुरी करून घेणे हा गुन्हा असला तरी कळंगुट, कांदोळीसारख्या समुद्रकिनारी परिसरात मोठमोठ्या हॉटेल, मसाज पार्लर, शॅक्स येथे सर्रासपणे अल्पवयीन मुले काम करताना आढळतात. काही मुलांकडून केवळ मजुरी करून घेतली जात नाही, तर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, शारीरिक अत्याचारही केले जातात. आर्थिक परिस्थितीने कमजोर असलेली मुले मोठी रक्कम मिळते, या आशेने मसाज पार्लर, हॉटेलमध्ये काम करण्यास तयार होतात. गांभीर्याची बाब म्हणजे अशा कामात केवळ परप्रांतीयांची मुले नव्हे, तर स्थानिक मुलांचाही समावेश असल्याचे सीआरजी संस्थेच्या निदर्शनास आले आहे. सीआरजी संस्थेतर्फे कांदोळी, कळंगुट परिसरात घेतलेल्या बाल ग्राम समितीत पोलीस अधिकारी, सामाजिक संस्थेचे सदस्य, पंचायतीचे सदस्य असून मुलांना एका व्यासपीठावर आपल्या समस्या, सूचना मांडण्याची मुभा देण्यात येते. समाजकार्यकर्ते एकनाथ नागवेकर म्हणाले, या परिसरात बालमजुरी थांबविण्यासाठी विविध स्तरांवर जागृती करण्याची गरज आहे. यात पोलिसांची मदत महत्त्वपूर्ण ठरेल. प्रत्येक शॅक, हॉटेल, मसाज पार्लर, गाडे यावर बालमजूर दिसल्यास मालकाला दंड आकारण्याचा नियम सुरू करण्याची गरज आहे, अशी सूचना त्यांनी केली. ‘सेव्ह कळंगुट’ संस्थेचे नितेश चोडणकर म्हणाले, पैशांची कमतरता असल्याने काही मुले मसाज पार्लर, हॉटेलमध्ये काम करतात. यात स्थानिक मुलेही असतात. काही मुले सकाळी शाळा आणि संध्याकाळी मजुरी करतात. ही बालमजुरी रोखण्यासाठी पोलिसांनी मालकांना सूचना देणे आणि वेळ पडल्यास दंड आणि कारवाई करण्याची मोहीम सुरू करणे आवश्यक आहे. समुद्रकिनाऱ्यावर भीक मागणाऱ्या मुलांच्या संख्येतही वाढ होत आहे. पर्यटन हंगाम जवळ आल्यानंतर त्यात लक्षणीय वाढ होते. त्याला आवर घालण्यासाठीही समाजिक संस्थांबरोबर पोलिसांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. कळंगुट, कांदोळी परिसर हा पर्यटकांमुळे नेहमीच गजबजलेला असतो. या परिसरात बालमजुरी आणि बाल अत्याचार यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मात्र, काही प्रकरणे नोंद होत नसल्याने ती कळत नाहीत. मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पर्यटकांना हॉटेल किंवा घरे भाड्याने देणाऱ्या मालकांनीही बाल सुरक्षा जबाबदारी उचलणे आवश्यक असल्याचा सूर बैठकीत उमटला. सीआरजीच्या सुषमा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. (प्रतिनिधी)