शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
2
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
3
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
4
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
5
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
6
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
7
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
8
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
9
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
10
सौदी-पाकिस्तानच्या अणु करारामुळे भारताचा मित्र असणारा मुस्लिम देश संतापला! मनधरणी करायला पाकचे सेना प्रमुख रवाना
11
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
12
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
13
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
14
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
15
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
16
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 
17
१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या
18
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
19
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
20
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे

'वारंवार बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांचा सावंत सरकारवरचा विश्वास उडाला'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 15:30 IST

कोरोनाची  लागण नसल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच कर्मचाऱ्यांना सर्वेला पाठवा; काँग्रेसची मागणी

मडगाव: मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सांवत सरकारची कोरोना हाताळण्याची दुर्बलता व  सरकारचे मिनिटा-मिनिटाला बदलणारे निर्णय व एकंदर गोंधळाचे वातावरण यामुळे गोव्यातील भाजप सरकारवरचा लोकांचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या सहा हजार सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन १३ एप्रिलपासून गोव्यात सुरू करण्यात येणार असलेल्या सामाजिक आरोग्य सर्वेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

याबद्दल बोलताना ते म्हणाले, प्रत्येक कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करावी व त्याना कोरोनाची लागण नसल्याचे प्रमाणपत्र  व सुरक्षा कवच सामग्री (पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट) देऊनच त्यांना लोकांच्या घरी पाठवावे. सरकारने उशिरा का होईना, परंतु टेस्टिंग प्रयोगशाळा गोव्यात सुरू केली. त्याचे आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्र्यांनी सामाजिक सर्वेपेक्षा सामाजिक टेस्टिंग करणे महत्वाचे आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी फ्रंटलायन कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण व पगारवाढ देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. परंतु, सदर घोषणा कागदोपत्रीच राहू नये याची सरकारने काळजी घेणे महत्वाचे आहे. दक्षिण गोवा इस्पितळ पूर्ण झाल्याची मुख्यमंत्र्यानी घोषणा करुन आठवडा उलटला तरी तेथे काम चालुच आहे तसा प्रकार या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होऊ नये असे चोडणकर म्हणाले.

सरकार आज कोव्हिड १९चा सामना करण्यासाठी अवाढव्य पैसा खर्च करीत आहे. सरकारच्या आरोग्य खात्याने तर सर्व निविदा प्रक्रिया व नियम बाजुला ठेवुन वेगवेगळ्या मोबाईल ॲपची खरेदी चालवली आहे. सदर ॲप केंद्र सरकारकडुन मोफत उपलब्ध होत असताना, खासगी आस्थापनांकडुन ते विकत घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यातले शीतयुद्ध आज संपूर्ण गोव्याला माहीत आहे.

मुख्यमंत्र्यानी राखीव खाण निधी कोव्हिड फंड म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने सर्व नियम पाळूनच जनतेचा पैसा खर्च करावा. काॅंग्रेस पक्ष सरकारच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे व कुठेही भ्रष्टाचार व लाचखोरी आढळल्यास आम्ही सरकारला उघडे पाडू हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात ठेवावे असा इशारा त्यांनी दिला.

सरकारने ६००० सरकारी कर्मचाऱ्यांना सामाजिक आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी पाचारण करताना त्यांची अगोदर कोरोना चाचणी करणे महत्वाचे आहे व त्याना सुरक्षाकवच सामग्री देणे गरजेचे आहे. जर यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असेल व ते लोकांच्या संपर्कात आले तर त्यामुळे संपूर्ण गोव्यात हाहाकार उडू शकतो. कोरोनावर अभ्यास केलेल्या अनेक तज्ञांनीही अशी भीती व्यक्त केली असून, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना सुरक्षाकवच सामग्री पुरवणे व सामाजिक टेस्टिंग करणे महत्वाचे असल्याचे प्रत्येक तज्ञांनी मान्य केले आहे. दुर्दैवाने केंद्र व राज्य सरकारने या नेमके याच गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री आपले निर्णय कायम बदलत असतात. सामाजिक सर्वेक्षण ख्रिस्ती समाजाच्या पवित्र दिवसांत घेण्याचा निर्णय त्यानी घेतला व त्यावर आम्ही आवाज उठवताच अवघ्या काही मिनीटांत त्यानी तो निर्णय फिरवला याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPramod Sawantप्रमोद सावंत