शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

ट्रकखाली सापडून पादचाऱ्याचा मृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2015 02:03 IST

वास्को : गुरुवारी सकाळी एलमोंत थिएटरनजीक झालेल्या एका अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला़ मुरगाव

वास्को : गुरुवारी सकाळी एलमोंत थिएटरनजीक झालेल्या एका अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला़मुरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात गुरुवारी सकाळी ११़३० वाजण्याच्या सुमारास घडला़ त्या वेळी अभय प्रभु यांच्या मालकीचा ट्रक क्र. जीए - ०५/टी - १२८९ हा सडा येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदळाच्या गोणी घेऊन फ ोंडा येथील नागरी पुरवठा खात्याच्या गोदामात जात होता़ त्या वेळी एलमोंत थिएटर जवळ रस्त्यावरून जात असलेल्या एका अज्ञात इसमास धडक लागली़ या धडकेत तो खाली कोसळला आणि ट्रकचे पुढील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला आणि त्याचे जागीच निधन झाले़ त्याचा चेहऱ्याचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याने तसेच कपड्यात कोणत्याच प्रकारचे ओळखपत्र न मिळाल्याने त्याची ओळख पटू शकली नाही; पण त्याच्या पेहरावावरून तो एक मजूर असावा, असा पोलिसांचा तर्क आहे़ मुरगाव पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच मुरगाव पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक कोरगावकर हे घटनास्थळी हजर झाले आणि अपघाताचा पंचनामा करून मृत्तदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगावच्या हॉस्पिसिओत पाठवून दिला. या अपघात प्रकरणी मुरगाव पोलिसांनी ट्रकचालक समोल कुमार याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे़दिस्तेरो रेल्वे व पूल ते सडा जंक्शन या रस्त्यावर अवजड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्त्यावर नेहमी अपघात होत असतात़ त्यामुळे हा रस्ता अपघातग्रस्त रस्ता म्हणून मानला जात आहे़ या रस्त्यावर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे़ सडा भागात भारतीय अन्न महामंडळाची गोदामे असल्याने या रस्त्यावरून नेहमी रेल्वेमधून आलेले धान्य बायणा येथील रेल्वे यार्डातून सडा गोदामात आणले जाते आणि त्यानंतर गोवा सरकारच्या नागरी पुरवठा खाते खरेदी करून आपल्या कुठ्ठाळी येथील गोदामात ठेवण्यात येते़ त्यामुळे या रस्त्यावरून धान्य भरलेल्या ट्रकांची नेहमी ने-आण करणारी वाहतूक चालूच असते़ तसेच सडा भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्याही जास्त असल्याने त्यांची दुचाकी व चारचाकी वाहनांची रहदारीही मोठ्या प्रमाणात होत असते़ हा रस्ता अरुंद असल्याने व वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने दिस्तेरो पूल ते सडा हा मार्ग अपघातग्रस्त रस्ता मानला जातो़ दिस्तेरो-सडा या मार्गावरील वाहनांची रहदारी पाहून मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी यापूर्वीच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतलेले असून कामाला प्रारंभही झालेला आहे़ येत्या वर्षभरात या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे़ तसेच भारतीय महामार्ग प्राधिकरणाने स्थगित झालेल्या वरुणापुरी ते मुरगाव बंदर पर्यंतच्या चौपदारी महामार्गाचे काम हाती घेतल्याने भविष्यकाळात या मार्गावरील अवजड वाहनांची रहदारी बंद होईल आणि त्यामुळे अपघात होण्याचेही टळणार आहे़ (प्रतिनिधी)ू