पणजी : राजकारणातून निवृत्त होण्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेले निवेदन दिशाभूलकारक आहे. देशातील व खास करून गोव्यातील जनतेला ते मूर्ख बनवीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी केली आहे. शांताराम प्रसिध्दी पत्रकात असे म्हणतात की, पर्रीकर हे राजकारणाच्या इतक्या अधीन झालेले आहेत की, राज्यात सत्ता मिळविण्यासाठी ते काहीही करू शकतात. केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून जाताना ते प्रादेशिक आराखडा, खाणी तसेच कॅसिनोंच्या प्रश्नाचे घोंगडे भिजत ठेवून गेले. निवृत्तीचे भाष्य केलेच नाही : पर्रीकर दरम्यान, पर्रीकर यांनी आपण राजकारणातून निवृत्तीचे भाष्य कु ठेही केले नसल्याचे व्टिटरवर म्हटले आहे. ‘वयाची ६0 वर्षे झाली की माणूस निवृत्तीचा विचार करू लागतो. मलाही तसे वाटणे साहजिक आहे; परंतु मला अजून केंद्रात मोठ्या जबाबदाऱ्या निभावयाच्या आहेत’, असे आपण म्हटले होते, असा दावा पर्रीकर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
निवृत्तीबाबत पर्रीकरांचे निवेदन दिशाभूलकारक : नाईक
By admin | Updated: December 1, 2015 01:58 IST