शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

पंचायत निवडणूक लांबणीवर?

By admin | Updated: April 14, 2017 02:46 IST

सद्गुरू पाटील ल्ल पणजीराज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या दि. २१ मेपर्यंत घेणे गरजेचे असले, तरी सरकार निवडणुका वेळेत घेऊ शकणार नाही,

सद्गुरू पाटील ल्ल पणजीराज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या दि. २१ मेपर्यंत घेणे गरजेचे असले, तरी सरकार निवडणुका वेळेत घेऊ शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकीय पातळीवरील शेकडो अधिकारी व कर्मचारी सध्या रजेवर आहेत. त्यामुळे कामे होत नसल्याने सरकार हतबल बनले आहे. पंचायत निवडणुका लांबणीवर टाकण्याचा विचार या हतबलतेमधून पुढे आल्याची माहिती मिळाली.पंचायत निवडणुका काही पक्षीय पातळीवर होत नाहीत; मात्र प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रत्येक मंत्री, आमदाराचे समर्थक उत्साहाने निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. काही पंचायत क्षेत्रांमध्ये मंत्री व आमदारही आपल्या कार्यकर्त्यांना रिंगणात उतरवून स्वत: त्या निवडणुकीत रस घेतात. यातून कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होतो व कटुता येते. काँग्रेसपेक्षाही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जास्त संख्येने पंचायत निवडणुकीमध्ये भाग घेतात. अधिकाधिक पंचायती स्वत:च्यात ताब्यात राहायला हव्यात, असा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न असतो.या वेळी गोवा फॉरवर्ड, मगोप आणि काही अपक्ष यांच्या सहभागाने भाजपला आघाडी सरकार बनवावे लागले आहे. अनेक मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार, मंत्री व अन्य उमेदवार पराभूत झालेले आहेत. पराभवाच्या सगळ्या आठवणी कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्येही ताज्या असतानाच पंचायत निवडणुकीस सामोरे जाण्याची गरज नाही, अशी भावना भाजपच्या आतील गोटात आहे. त्यामुळेही सरकार सध्या पंचायत निवडणुकीस सामोरे जाण्यात जास्त उत्साह दाखवत नाही. पंचायत संचालक गुरुदास पिळर्णकर यांची अचानक बदली करून सरकारने ते दाखवूनही दिले आहे.प्रभाग फेररचना न करता पूर्वीच्याच प्रभागांनुसार व पूर्वीच्याच आरक्षणानुसार निवडणुका घ्याव्यात, असेही सरकारला प्रारंभी वाटत होते; पण ही कल्पना मुख्य सचिवांना आवडली नाही, असे सूत्रांकडून कळते.दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी गुरुवारी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पंचायत निवडणुका लांबणीवर टाकाव्यात की वेळेत घ्याव्यात, याबाबतचा निर्णय येत्या तीन दिवसांत होईल.