शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

पंचायत निवडणूक लांबणीवर?

By admin | Updated: April 14, 2017 02:46 IST

सद्गुरू पाटील ल्ल पणजीराज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या दि. २१ मेपर्यंत घेणे गरजेचे असले, तरी सरकार निवडणुका वेळेत घेऊ शकणार नाही,

सद्गुरू पाटील ल्ल पणजीराज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या दि. २१ मेपर्यंत घेणे गरजेचे असले, तरी सरकार निवडणुका वेळेत घेऊ शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकीय पातळीवरील शेकडो अधिकारी व कर्मचारी सध्या रजेवर आहेत. त्यामुळे कामे होत नसल्याने सरकार हतबल बनले आहे. पंचायत निवडणुका लांबणीवर टाकण्याचा विचार या हतबलतेमधून पुढे आल्याची माहिती मिळाली.पंचायत निवडणुका काही पक्षीय पातळीवर होत नाहीत; मात्र प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रत्येक मंत्री, आमदाराचे समर्थक उत्साहाने निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. काही पंचायत क्षेत्रांमध्ये मंत्री व आमदारही आपल्या कार्यकर्त्यांना रिंगणात उतरवून स्वत: त्या निवडणुकीत रस घेतात. यातून कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होतो व कटुता येते. काँग्रेसपेक्षाही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जास्त संख्येने पंचायत निवडणुकीमध्ये भाग घेतात. अधिकाधिक पंचायती स्वत:च्यात ताब्यात राहायला हव्यात, असा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न असतो.या वेळी गोवा फॉरवर्ड, मगोप आणि काही अपक्ष यांच्या सहभागाने भाजपला आघाडी सरकार बनवावे लागले आहे. अनेक मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार, मंत्री व अन्य उमेदवार पराभूत झालेले आहेत. पराभवाच्या सगळ्या आठवणी कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्येही ताज्या असतानाच पंचायत निवडणुकीस सामोरे जाण्याची गरज नाही, अशी भावना भाजपच्या आतील गोटात आहे. त्यामुळेही सरकार सध्या पंचायत निवडणुकीस सामोरे जाण्यात जास्त उत्साह दाखवत नाही. पंचायत संचालक गुरुदास पिळर्णकर यांची अचानक बदली करून सरकारने ते दाखवूनही दिले आहे.प्रभाग फेररचना न करता पूर्वीच्याच प्रभागांनुसार व पूर्वीच्याच आरक्षणानुसार निवडणुका घ्याव्यात, असेही सरकारला प्रारंभी वाटत होते; पण ही कल्पना मुख्य सचिवांना आवडली नाही, असे सूत्रांकडून कळते.दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी गुरुवारी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पंचायत निवडणुका लांबणीवर टाकाव्यात की वेळेत घ्याव्यात, याबाबतचा निर्णय येत्या तीन दिवसांत होईल.