पणजी : काही दिवस आंदोलन करणाऱ्या महापालिका कामगारांच्या आंदोलनास गंभीर वळण लाभले आहे. कामगारांनी कामाचा वेग कमी करून पणजीतील अनेक भागात कचरा उचलणेच थांबविले आहे. कामगारांनी महापालिकेच्या वाहनांची हानी केल्याचा आरोप महापौर शुभम चोडणकर यांनी केला आहे. पणजीत घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करण्याचे काम कामगार करतात. महापालिका वेतनाची मागणी पुरी करत नसल्याने संतप्त कामगारांनी पणजीतील आल्तीनोसह अन्य अनेक भागांमध्ये सोमवारी कचरा उचलणेच बंद केले. परिणामी महापालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. महापालिकेच्या गॅरेजमध्ये पार्क केलेल्या वाहनांची कामगारांकडून हानी करण्यात आली, असे महापौर चोडणकर यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या पाण्याची जोडणी तोडली. कार्यालयांची हानी केली गेली व महापालिकेचा मुख्य दरवाजा अडविला, असे चोडणकर यांनी सांगितले. (पान २ वर)
पणजीत कचराकोंडी
By admin | Updated: July 7, 2015 01:54 IST