शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एक तृतीयांश गोवा अन्न सुरक्षेवर अवलंबून

By admin | Updated: September 9, 2016 20:53 IST

गोव्यात आता साडेपाच लाखांर्पयत पोहोचल्यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत एक तृतीयांश गोवा या योजनेचा लाभार्थी ठरला आहे.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ९ - केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थीची संख्या गोव्यात आता साडेपाच लाखांर्पयत पोहोचल्यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत  एक तृतीयांश गोवा या योजनेचा लाभार्थी ठरला आहे. सरकारच्या अन्य योजनांपैकी राज्य सरकारच्या नागरी पुरवठा खात्याकडून अंमलबजावणी करण्यात येणारी ही एकमेव मोठी योजना आहे. या योजनेचा लाभ 5 लाख 40 हजार लोकांना मिळत आहे. 
 
साधारण पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या राज्यातील साडेपाच लाख लोकांना या योजनेचा लाभ देण्यास नागरी पुरवठा खाते यशस्वी झाले आहे. राज्यातील महिला आणि बाल कल्याण खात्यातर्फे अंमलबजावणी करण्यात येणा:या गृहआधार योजनेचा सव्वा लाख महिलांना लाभ मिळत आहे. तर निराधार नागरिक, विधवा, अपंग, एचआयव्हीग्रस्त अशा घटकांसाठी असलेल्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे दीड लाख लाभार्थी आहेत. तर लाडली लक्ष्मी योजनेचा काही हजार मुली व महिलांनी लाभ घेतला आहे.
 
तर नव्याने अंमलबजावणी करण्यात आलेल्या दीनदयाळ स्वास्थ विमा योजनेचा साधारण अडीच लाख लोकांना लाभ मिळणार आहे. आतार्पयत सुमारे दोन लाख लोकांनी या योजनेसाठी नावनोंदणी केली आहे. मात्र केंद्र सरकारची अन्न सुरक्षा योजना अशी एकमेव योजना आहे जी अत्यंत कमी कालावधीत एक तृतीयांश गोव्याला आपल्या कक्षेखाली आणणारी ठरली आहे. 
 
राज्यात सध्या 1 लाख 36 हजार 163 कुटुंबे अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतात. दक्षिण गोव्यात 69919 तर उत्तर गोव्यात 66244 कुटुंबे या योजनेखाली आहेत. एकूण पाच लाख 40 हजार लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. गेल्या दीड वर्षापासून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागरी सुरक्षा खाते काम करत आहे. रेशनकार्डाचे डिजिटलायङोशन, पडताळणी, बोगस रेशन कार्डे बाद ठरवणो किंवा नवीन रेशन कार्डे तयार करणो यापासूनची सगळी कामे या योजनेच्या प्रक्रिये अंतर्गत आली आहेत.
 
केंद्रात काँग्रेस प्रणीत आघाडी सरकार अधिकारावर असताना अन्न सुरक्षा कायदा संमत झाला होता. गोव्यात या कायद्याची अंमलबजावणी करण्यास विलंब झाला. मात्र उशिरा अंमलबजावणी सुरु झाली तरी ती निदरेष पद्धतीने व प्रभावीरित्या मार्गी लागली आहे.