शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

42 कंपन्यांना 1200 कोटींच्या वसुलीसाठी नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 22:22 IST

राज्यातील 42 खाण कंपन्यांच्या खाण धंद्याची चौकशी करून चार्टर्ड अकाऊण्टंट्सच्या समितीने आपला अहवाल सरकारला दिला आहे.

पणजी : राज्यातील 42 खाण कंपन्यांच्या खाण धंद्याची चौकशी करून चार्टर्ड अकाऊण्टंट्सच्या समितीने आपला अहवाल सरकारला दिला आहे. त्या अहवालाच्या आधारे 1 हजार 200 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पुढील महिन्याभरात सर्व 42 कंपन्यांना नोटीसा पाठविल्या जातील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) एकूण नऊ बेकायदा खाण प्रकरणी चौकशी काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.सरकार राज्यातील खनिज व्यवसाय कधी सुरू करणार आहे व कोणती पाऊले उचलली जात आहेत अशी विचारणा करणारा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासावेळी विरोधी आमदारांनी मांडला होता. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासह पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही सरकारला प्रश्न विचारला. विरोधात असताना भाजपने गोव्यात 28 हजार कोटींचा बेकायदा खाण घोटाळा सुरू असल्याचा आरोप केला होता, असा संदर्भ देऊन रेजिनाल्ड म्हणाले की भाजपमुळे खाण व्यवसाय बंद पडला. आता खाणी नव्याने सुरू करण्यासाठीही सरकार गंभीरपणो पाऊले उचलत नाही, उलट दोन कंपन्याच सर्वोच्च न्यायालयात गेल्याने डंप वाहतुकीचा आदेश तरी आला, असे रेजिनाल्ड म्हणाले.खाण धंदा सुरू करण्यासाठी कोणती पाऊले सरकारने उचलली त्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. बेकायदा खाण प्रकरणी सरकार कुणालाच सोडणार नाही. सगळी वसुली केली जाईल. पुढील महिन्याभरात नोटीसा जारी होतील. तसेच नऊ बेकायदा प्रकरणी एसआयटी चौकशी काम करत आहे. एसआयटीने कुणाचेच चौकशी काम बंद केलेले नाही. एका प्रकरणी तर एसआयटीने हायकोर्टातही आव्हान दिले आहे. काही प्रकरणी पुढील अधिवेशनापूर्वी प्रत्यक्ष कारवाई होईल. बेकायदा खाण प्रकरणी यापूर्वी 3 कोटी 99 लाख रुपयांची वसुली झाली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.मुख्यमंत्री म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच रॉयल्टी भरलेल्या खनिजाची वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. एकूण 1.45 दशलक्ष टन खनिज माल असा आहे, ज्याची रॉयल्टी भरली गेली आहे. त्याशिवाय 7.7 दशलक्ष टन खनिज माल पडून आहे. सहा महिन्यांत वाहतूक करता येईल. यापूर्वी सरकारने 22 ई-लिलाव केले. त्याद्वारे 16.81 दशलक्ष टन खनिजाचा लिलाव पुकारला गेला व 13.54 दशलक्ष टन खनिज विकले गेले. त्यातून सरकारला 130 कोटींचा महसुल मिळाला. राज्य सरकारने खाण बंदीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकाही सादर केली आहे असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.