शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मित्रमंडळाचे गोव्यात मोठे योगदान : पार्सेकर

By admin | Updated: March 2, 2015 01:21 IST

मडगाव : गोव्याच्या जडणघडणीत मराठा मित्रमंडळाचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रवींद्र भवनात शिवजयंती

मडगाव : गोव्याच्या जडणघडणीत मराठा मित्रमंडळाचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रवींद्र भवनात शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले. या वेळी व्यासपीठावर रवींद्र भवनचे अध्यक्ष दामोदर नाईक, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एम. एस. मोटनकर, मराठा मित्र मंडळ गोवाचे अध्यक्ष रघुनाथ दळवी व प्रमुख वक्ते म्हणून सुजित माने उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गोव्याला देश स्वतंत्र झाल्यानंतर चौदा वर्षांनी मुक्ती मिळाली, त्यामुळे तीन पंचवार्षिक योजनांना गोव्याला मुकावे लागले. गोवा मुक्त झाल्यानंतर शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक अशा विविध सरकारी नोकऱ्यांसाठी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील लोकांची या पदावर नियुक्ती केली. काहीजण संचालकपदावरून निवृत्त झाले. आज त्यांची पिढी उच्चशिक्षित होऊन गोव्यातच नोकरी क रू लागली आहे. जरी विविध ठिकाणी नोकरी करत असले तरी गोव्यात राहिल्यामुळे गोवेकर बनले आहेत. त्यामुळे गोव्याची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पार्सेकर यांनी केले. चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अतुलनीय कार्य केले. त्यामुळे त्यांचे कार्य आजही सर्वांच्या मनात टिकून आहे. दरवर्षी त्यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी शिवजयंती साजरी केली जाते. शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण झाल्यावर सर्वाच्या अंगात नवीन ताकद, नवी ऊर्जा निर्माण होते, असे ते म्हणाले. दामोदर नाईक यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा. त्याचबरोबर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण आपल्या देशावर होत असून हे कुठेतरी थांबवले पाहिजे. जुन्या रूढी, परंपरा नव्या पिढीला देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, नाहीतर एक दिवस भारतीय संस्कृतीच चांगली होती, असे म्हणण्याची वेळ येऊ नये, असे ते म्हणाले. या वेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एम. एस. मोटनकर यांचा मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मराठा मित्रमंडळाच्या वतीने पार्सेकर, दामोदर नाईक, सुजित माने यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)