शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

पर्रीकरांच्या वाढदिनासाठी लगबग

By admin | Updated: November 29, 2015 01:59 IST

पणजी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वाढदिन सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सरकार आणि भारतीय जनता पक्ष

पणजी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वाढदिन सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सरकार आणि भारतीय जनता पक्ष मिळून करत आहे. राज्यभर भाजपच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. वाढदिन सोहळ्यानिमित्त भाजप कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर होईल व त्यांच्यात नव्याने चैतन्य निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. सत्कार समितीच्या आयोजन समितीची मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बैठक घेऊन तयारी कुठवर पोहोचली आहे, याचा आढावा घेतला. आम्ही येत्या १३ डिसेंबर रोजी कांपाल येथे मोठी गर्दी जमवू. पर्रीकरांच्या वाढदिन सोहळ्यानिमित्त भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. गेल्या साडेतीन वर्षांच्या सत्ताकाळात जर संघटनात्मक पातळीवर कुठे मरगळ आलेली असेल, तर ती आता जाईल. सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या बैठका सुरू आहेत. येत्या १३ रोजी गर्दी जमविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. पर्रीकर हे वयाची ६0 वर्षे येत्या १३ रोजी पूर्ण करत असल्याने हा सत्कार आहे. पुढील वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने पर्रीकरांचा सत्कार सोहळा हा त्या दृष्टीनेही उपयुक्त ठरेल, असे पार्सेकर म्हणाले. दरम्यान, या सत्कार सोहळ्यावर सरकार खर्च करत नाही. १३५ सदस्यांची आयोजन समिती मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी नेमली आहे. त्या समितीवर भाजपच्या नेत्यांसह ‘मगो’चे मंत्री व सत्ताधारी आघाडीतील अन्य पक्षांचेही आमदार आहेत. तसेच दोन उद्योगपतीही आहेत. पर्रीकरांच्या सत्कारानिमित्त होणारी सभा ही एकप्रकारे पुढील विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडणारीच ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. (खास प्रतिनिधी)