शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

पत्रकारांनी संशोधन करावे : पूजा मेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 19:47 IST

इंटरनॅशनल सेंटर गोवातर्फे पूजा मेहरा लिखित ‘द लॉस्ट डिकेड’वर आयोजित ‘किताब- बुक्स इन डिस्कशन’निमित्त गोव्यात आलेल्या लेखिका-पत्रकार पूजा मेहरा यांच्याशी साधलेला संवाद.

- दुर्गाश्री सरदेशपांडेआज अर्थव्यवस्था आणि व्यवसायाशी निगडित माहिती देण्यासाठी अनेक वर्तमानपत्रे , न्यूज चॅनल्स आहेत. भारतात बिझनेस जर्नालिझम क्षेत्राचा विकास केव्हा होऊ लागला?- २००५ मध्ये आमची अर्थव्यवस्था वाढत होती. टाटासारखी कंपनी विदेशात जाऊन छोट्या-मोठ्या कंपन्या खरेदी करू लागले होते. विदेशात व्याज दर कमी असल्यामुळे लोक मोठी खरेदी करायचे. त्यामुळे या काळात अर्थव्यवस्थेवर लोकांची नजर जास्त असल्यामुळे बिझनेस जर्नालिझम क्षेत्राचा देखील विकास होऊ लागला. या क्षेत्रात नोकऱ्यांची वाढ होऊ लागली. याच काळात हिंदुस्थान टाइम्सने ‘मिंट’ नावाचे वर्तमानपत्र काढले. त्यानंतर इकॉनॉमिक टाइम्सचे वितरण वाढले. यानंतर अनेक वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनल्स येऊ लागले.राजकीय आणि इतर पत्रकार संबंधित व्यक्तीशी चर्चा करून बातम्या लिहितात. मात्र, व्यावसायिक पत्रकारितेमध्ये असे होत नाही. याचा परिणाम बातम्याच्या दर्जावर होतो का?- व्यावसायिक पत्रकारांना एक तर कंपनीचा वार्षिक अहवाल, पीआर किंवा कंपनीच्या विरोधकांकडून माहिती मिळते. तसेच तिसºया व्यक्तीकडूनही माहिती मिळत असते. पत्रकार प्रश्न विचारतो किंवा त्याला पाहिजे म्हणून ही माहिती मिळत नाही. इच्छुक व्यक्तीकडून माहिती मिळत असल्यामुळे पूर्ण माहिती मिळत नाही आणि अनेक गोष्टी लपविल्या जातात. हे होऊ नये म्हणून पत्रकाराने खूप संशोधन करायला पाहिजे नंतर प्रश्न विचारले पाहिजेत. जोपर्यंत आपल्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोवर त्यांना प्रश्न विचारत राहिले पाहिजे.तुमच्या पुस्तकात २००८-२०१८ या काळातील आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेबाबत सांगितले आहे. २००८ पूर्वीचा काळ आर्थिकदृष्ट्या कसा होता?- पूर्वी जीडीपी ८.८ टक्क्यांनी वाढत होती. विदेशात व्याज दर कमी असल्यामुळे भारतात लोक छोटी कंपनी उभारू लागले. याच काळात मोठमोठे पूल आणि रस्ते बांधण्यात आले. त्यासाठी कामगारांची गरज होती. त्यामुळे गावाकडची मंडळी शहरात येऊ लागली आणि कमवू लागली. जगातील अर्थव्यवस्था उत्तमरीत्या चालत असल्याने भारताची अर्थव्यवस्था सुधारत होती. मात्र, २००८नंतर जागतिक अर्थव्यवस्था कोसळली. भारतात २००८ मध्ये घडलेल्या दोन मुख्य घटनांनी सर्व काही बदलले. एक म्हणजे मुंबईमध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील हृदय शस्त्रक्रिया. त्यामुळे प्रणव मुखर्जी अर्थमंत्री झाले आणि इथून भारताची अर्थव्यवस्था बदलू लागली.बदलत्या काळानुसार आणि बदलत्या माध्यमाचा परिणाम अर्थव्यवस्था संबंधित बातम्यांवर झाला आहे का?- पूर्वी प्रिंट मीडिया असल्यामुळे पत्रकारांना संशोधनासाठी वेळ मिळत होता आणि त्यावेळी लिहिणारा पत्रकार देखील अनुभवी असायचा. तेव्हा फक्त अनुभवी पत्रकारांना व्यापार प्रतिनिधी म्हणून घेत होते. २०-२५ वर्षांनंतर या पदावर यायचे. आता ही स्थिती नाही. आता ‘टीआरपी रेट’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जाळ्यात अडकल्यामुळे पत्रकार खूप संशोधन करत नाहीत. सर्वजण ‘ब्रेकिंग न्यूज’ देण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे संशोधनासाठी वेळच मिळत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नोटबंदीनंतर काही न्यूज चॅनल्सवर दोन हजारांच्या नोटवर ‘चीप’ आहे, अशी बातमी प्रसिद्ध केली होती. सध्या बिझनेस जर्नालिझम नाही तर बिझनेससाठी जर्नालिझम होत आहे. आजपर्यंत अनेक न्यूज वेबसाइट्स आल्या. सध्याची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्यामुळे आणि बिझनेस मॉडेल स्पष्ट नसल्यामुळे काही वेबसाइट्स बंद पडू लागल्या आहेत. अर्थव्यवस्था ठीक नसली की जाहिरातीवर परिणाम होतो आणि हे सर्व माध्यमे त्यावरच अवलंबून आहेत.