शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अर्भक मृत्यूचे प्रमाण घटले

By admin | Updated: March 11, 2015 03:15 IST

पणजी : राज्यात २००७ सालापासून आरोग्य खात्याच्या स्तरावरून सुरू झालेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून आता अर्भक मृत्यूचे प्रमाण

पणजी : राज्यात २००७ सालापासून आरोग्य खात्याच्या स्तरावरून सुरू झालेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून आता अर्भक मृत्यूचे प्रमाण बरेच घटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची दखल घेऊन गोव्याला ११२ कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी दिला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. गोव्यात मात्र आता १ हजारामागे ९ असे प्रमाण झाले आहे. काही वर्षांपूर्वी हे प्रमाण हजारामागे १0 असे होते. म्हणजे एक हजार महिलांची प्रसुती झाली, तर त्यातील दहा अर्भकांचा बळी जात होता. याबाबत उपाययोजना करण्याची प्रक्रिया गेल्या २००७ सालापासून सुरू झाली व त्यामुळे आता अर्भक मृत्यूचे प्रमाण हजारामागे नऊ झाले आहे, असे उपमुख्यमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले. दरम्यान, बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात हृदयरोगविषयक सुपरस्पेशालिटीची सुविधा सुरू झाल्यानंतर आता वर्षभरात २१०० व्यक्तींवर हृदयरोगविषयक उपचार करण्यात आले. यात अँजीओग्राफी व अँजीओप्लास्टीचा समावेश आहे. २१०० पैकी केवळ एकच व्यक्ती उपचारानंतर दगावली. उर्वरित सगळे ठिक आहेत, असे उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी सांगितले. राज्यात स्वाईन फ्लू नियंत्रणात आहे. आतापर्यंत ६९ व्यक्तींच्या थुंकीचे नमुने दिल्लीला पाठविण्यात आले. त्या सर्वांचे अहवाल आले. प्रत्येक चाचणीसाठी सरकारला ४ हजार ५०३ रुपयांचा खर्च करावा लागला. दिल्लीहून अहवाल येण्यास विलंब लागतो. यापुढे आम्ही कर्नाटकमधील मणिपालमध्ये नमुने पाठवू. तिथे एका चाचणीसाठी साडेचारशे रुपयांचा खर्च येईल, असे डिसोझा यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)