शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

अपक्ष आमदारांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा

By admin | Updated: November 24, 2015 01:30 IST

पणजी : एफटीआयआयच्या आंदोलक विद्यार्थ्यांना अपक्ष आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी पाठिंबा

पणजी : एफटीआयआयच्या आंदोलक विद्यार्थ्यांना अपक्ष आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या विद्यार्थ्यांनी येथील पिएदाद इन्स्टिट्यूट सभागृहात आयोजिलेल्या समांतर चित्रपट महोत्सवास सरकारने पोलिसी बळाचा वापर करून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्यास मतदारसंघातील लोकांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशाराही या तिन्ही आमदारांनी दिला. तिन्ही अपक्ष आमदारांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली. आघाडीचे चित्रकार सुबोध केरकर यांनीही विद्यार्थ्यांना समर्थन दिले आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नसल्याचे जे विधान केले आहे त्याचा आमदार सरदेसाई यांनी निषेध केला. ते म्हणाले की, राज्यात आणीबाणीसदृश स्थिती आहे. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना इफ्फीस्थळी जी वागणूक दिली जात आहे ती पाहता हुकूमशाहीच चालल्याचे दिसते. केंद्रात भाजपने मर्जीतील लोकांची नियुक्ती करून एफटीआयआय संस्थाच हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेच्या संचालकपदी नेमलेली व्यक्ती त्या पदास पात्र नाही आणि त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळ केला जात आहे. राज्य सरकार इफ्फीचे आयोजन करते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरदेसाई यांनी असाही आरोप केला की, पोलिसांचे दंडेलशाही इफ्फीच्या ठिकाणीच नव्हे, तर इतरत्रही घडत आहे. फा. बिस्मार्क यांना न्याय मिळावा या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी हात टाकला. गोव्याचे नाव यामुळे खराब होत आहे. आमदार रोहन खंवटे यांनीही राज्यात हुकूमशाही चालू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे. भाजप विरोधात असताना त्यांचे आमदार मनाविरोधात काही झाले तर रस्ते अडवायचे. आता इतरांनी ते केले तर सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. केवळ एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचाच छळ चालला आहे, असे नव्हे तर अन्य बाबतीतही असेच घडत आहे. फा. बिस्मार्क प्रकरणात आंदोलकांना पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळले ते चुकीचे आहे. आघाडीचे चित्रकार सुबोध केरकर यांनीही या विद्यार्थ्यांना पाठिंबा देताना एफटीआयआयसारख्या प्रतिष्ठेच्या संस्थेशी भाजप सरकारने खेळ मांडल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, कला कोणतीही असो ती बहरावी, या क्षेत्रात अधिकाधिक लोकांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पात्र नसलेल्या व्यक्तीला संस्थेच्या प्रमुख पदावर बसविणे अन्यायकारक आहे. ते खपवून घेता कामा नये. अपक्ष आमदार नरेश सावळही या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)