शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

अपक्ष आमदारांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा

By admin | Updated: November 24, 2015 01:30 IST

पणजी : एफटीआयआयच्या आंदोलक विद्यार्थ्यांना अपक्ष आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी पाठिंबा

पणजी : एफटीआयआयच्या आंदोलक विद्यार्थ्यांना अपक्ष आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या विद्यार्थ्यांनी येथील पिएदाद इन्स्टिट्यूट सभागृहात आयोजिलेल्या समांतर चित्रपट महोत्सवास सरकारने पोलिसी बळाचा वापर करून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्यास मतदारसंघातील लोकांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशाराही या तिन्ही आमदारांनी दिला. तिन्ही अपक्ष आमदारांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली. आघाडीचे चित्रकार सुबोध केरकर यांनीही विद्यार्थ्यांना समर्थन दिले आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नसल्याचे जे विधान केले आहे त्याचा आमदार सरदेसाई यांनी निषेध केला. ते म्हणाले की, राज्यात आणीबाणीसदृश स्थिती आहे. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना इफ्फीस्थळी जी वागणूक दिली जात आहे ती पाहता हुकूमशाहीच चालल्याचे दिसते. केंद्रात भाजपने मर्जीतील लोकांची नियुक्ती करून एफटीआयआय संस्थाच हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेच्या संचालकपदी नेमलेली व्यक्ती त्या पदास पात्र नाही आणि त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळ केला जात आहे. राज्य सरकार इफ्फीचे आयोजन करते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरदेसाई यांनी असाही आरोप केला की, पोलिसांचे दंडेलशाही इफ्फीच्या ठिकाणीच नव्हे, तर इतरत्रही घडत आहे. फा. बिस्मार्क यांना न्याय मिळावा या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी हात टाकला. गोव्याचे नाव यामुळे खराब होत आहे. आमदार रोहन खंवटे यांनीही राज्यात हुकूमशाही चालू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे. भाजप विरोधात असताना त्यांचे आमदार मनाविरोधात काही झाले तर रस्ते अडवायचे. आता इतरांनी ते केले तर सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. केवळ एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचाच छळ चालला आहे, असे नव्हे तर अन्य बाबतीतही असेच घडत आहे. फा. बिस्मार्क प्रकरणात आंदोलकांना पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळले ते चुकीचे आहे. आघाडीचे चित्रकार सुबोध केरकर यांनीही या विद्यार्थ्यांना पाठिंबा देताना एफटीआयआयसारख्या प्रतिष्ठेच्या संस्थेशी भाजप सरकारने खेळ मांडल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, कला कोणतीही असो ती बहरावी, या क्षेत्रात अधिकाधिक लोकांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पात्र नसलेल्या व्यक्तीला संस्थेच्या प्रमुख पदावर बसविणे अन्यायकारक आहे. ते खपवून घेता कामा नये. अपक्ष आमदार नरेश सावळही या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)