शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

हरमल किनाऱ्यावर बेकायदा व्यवसाय

By admin | Updated: March 9, 2015 22:41 IST

कोरगाव : हरमल किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लमाणी लोकांनी हैदोस घातला असून अंदाजे ५०० हून अधिक लमाणी लोक या समुद्रकिनाऱ्यावर कपडे,

कोरगाव : हरमल किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लमाणी लोकांनी हैदोस घातला असून अंदाजे ५०० हून अधिक लमाणी लोक या समुद्रकिनाऱ्यावर कपडे, खोट्या सोन्याचे दागिने विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायाआडून अन्य प्रकारचे बेकायदेशीर प्रकार या ठिकाणी खुलेआम चालू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. समुद्रकिनाऱ्यापासूनच ५० मीटरवर हरमल पोलीस आउट पोस्ट आहे. येथे चाललेले सर्व प्रकार या आउट पोस्टच्या नजरेतून सुटणे शक्यच नाही, किंबहुना त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी लमाणी लोकांचे व्यवहार चालू आहेत. गेल्या वर्षी या लमाणी लोकांकडून पोलिसांना महिन्याकाठी ७० ते ९० हजारांचा हप्ता मिळत असल्याची चर्चा होती. या वर्षी हा आकडा वर चढल्याचे सांगितले जाते. पर्यटन हंगाम संपत आला तरी येथील पोलिसांनी एकाही लमाण्याच्या विरोधात कारवाई केल्याचे उदाहरण नाही. अनेकवेळा स्थानिक लोकांनी हरमल आउट पोस्टचे प्रमुख साळगावकर, त्यांचे वरिष्ठ चोडणकर यांना वेळोवेळी सांगूनही काहीच कारवाई झालेली नाही. याचा अर्थच या ठिकाणी लमाणी विक्रेत्यांना सगळे काही माफ आहे, असा स्थानिक लावतात . भरदिवसा हे लमाणी लोक विदेशी पर्यटकांना, त्यांच्या बाजूला बसून आपले कपडे विकण्याचा प्रयत्न करतात. हे केवळ निमित्त. अनेकदा या कपड्यांच्या आत काय लपले आहे हे लमाणी आणि पर्यटकांबरोबर येथील पोलिसांनासुद्धा ज्ञात आहे. या लमाणी लोकांकडे सर्रास तीन पिशव्या असतात. एकीत कपडे सामान, दुसरीत बांगड्या व अन्य वस्तू. मात्र, तिसऱ्या पिशवीत काय असते हे गुपित अजूनही कोणालाच कळलेले नाही. हरमल आउट पोस्टवर अनेक प्रकरणे येत असतात. त्यातील ९० टक्के प्रकरणे मध्यस्थी करून सोडविली जातात. या मध्यस्थीमुळे या भागात सर्वांचाच ‘विजय’ होत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अशा अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांना योग्य ती कडक कारवाई करण्याची मागणी येथील लोक करीत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर अनेक कायदेशीर बाबी पूर्ण करून काही दुकानवाले आपली दुकाने थाटतात. दुसऱ्या बाजूने पोलिसांच्या सहकार्याने लमाणी लोक खुल्लम खुल्ला व्यवसाय करून या सनदशीर व्यवसायाला तोट्यात आणतात. अशा लोकांना सांभाळून घेणाऱ्या पोलिसांना ताकीद मिळावी, अशी मागणी या भागातील लोकांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)