शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

आंबेडकरांच्या नावे गृहनिर्माण योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 02:16 IST

पणजी : सरकार पुढील काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने गृहनिर्माण योजना तयार करील. या योजनेचा लाभ

पणजी : सरकार पुढील काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने गृहनिर्माण योजना तयार करील. या योजनेचा लाभ समाजाचे सर्वच घटक घेऊ शकतील. सगळेच घटक एकाच वसाहतीत निवास करू शकतील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी येथे झालेल्या आंबेडकर जयंतीच्या मुख्य कार्यक्रमावेळी जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले की, अनुसूचित जमातींसाठी ज्या योजना सरकारने यापूर्वी आखल्या त्या योजनांचा लाभ आता अनुसूचित जातींच्या लोकांनाही दिला जात आहे. एकूण २१ योजना या वर्षापासून आम्ही अनुसूचित जातींना लागू करून त्यासाठी अर्र्थसंकल्पात पुरेशी आर्थिक तरतूदही केली आहे. आतापर्यंत समाजाच्या ज्या वर्गास योजनांचा लाभ मिळाला नाही, त्यांना तो मिळावा असा त्यामागे आमचा हेतू आहे. राज्यात राज्यस्तरीय असे आंबेडकर भवन उभे राहावे, अशा प्रकारची मागणीही येत आहे. तालुका स्तरावरही आंबेडकर भवनांची व्यवस्था करता येईल, अशा प्रकारच्या तरतुदी यापूर्वी अनुसूचित जमात कल्याण निधीतून सरकारने केल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या राज्यातील ३४-३५ ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जातींसाठी प्रभाग आरक्षित आहेत. राज्यातील अन्य ज्या ज्या पंचायत क्षेत्रात अनुसूचित जातींची लोकसंख्या असेल त्या सर्व पंचायतींमध्ये येत्या पंचायत निवडणुकीपूर्वी सरकार अनुसूचित जातींसाठी आरक्षणाची व्यवस्था करील. समाज कल्याण खात्यातर्फे येथे आयोजित या सोहळ्यावेळी वनमंत्री राजेंद्र आर्लेकर, समाज कल्याण मंत्री महादेव नाईक, उपसभापती विष्णू वाघ, उच्च शिक्षण खात्याचे संचालक भास्कर नायक आदी व्यासपीठावर होते. भास्कर नायक आपल्या भाषणावेळी म्हणाले की, गांधी व आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद होते; पण आंबेडकरांचे महत्त्व गांधीजींनी ओळखले होते. म्हणूनच घटना लिहायचे काम गांधीजींनीच आंबेडकरांकडे सोपविले. या वेळी रमेश कुलकर्णी, गंगाराम मोरजकर, सखाराम कोरगावकर, गणेश पवार यांचा सत्कार करण्यात आला. (खास प्रतिनिधी)