शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

डोके आणि मानेच्या कर्करोगाचे रुग्ण एक-तृतियांश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 20:14 IST

एक-तृतियांश कर्करोग रुग्ण डोके आणि मानेच्या कॅन्सरने त्रस्त असतात, अशी माहिती मुंबईतील टाटा मेमोरियल इस्पितळाचे संचालक तथा आघाडीचे शल्यविशारद

पणजी : एक-तृतियांश कर्करोग रुग्ण डोके आणि मानेच्या कॅन्सरने त्रस्त असतात, अशी माहिती मुंबईतील टाटा मेमोरियल इस्पितळाचे संचालक तथा आघाडीचे शल्यविशारद डॉ. अनिल के. डिक्रुझ यांनी येथे दिली. बदलती जीवनशैली हे कारण आहेच, त्याचबरोबर ४0 ते ५0 टक्के रुग्णांना कर्करोग तंबाखु सेवनामुळेच होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तंबाखु सेवनावर नियंत्रणासाठी प्रभावी कायद्याची गरज त्यांनी व्यक्त केली तसेच तंबाखुजन्य पदार्थांवरील कर आणखी वाढविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.गोवा कॅन्सर सोसायटीने आयोजित केलेल्या उपक्रमांतर्गत गोमेकॉतील डॉक्टर, विद्यार्थी, सल्लागार डॉक्टर यांच्यासाठी त्यांनी व्याख्यान दिले. सुमारे ८0 डॉक्टर यात सहभागी झाले होते. डॉ. डिक्रुझ म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेचे एक अनुमान असे सांगते की पुढील १0 वर्षात विकसनशील देशांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दोन-तृतियांश होणार आहे. आजपावेतो विकसित देशांमध्ये प्रमाण जास्त आढळून आलेले आहे त्यास बदलती जीवनशैली हे कारण आहे. आता हे लोण विकसनशील देशांमध्येही पोचले आहे. शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तंबाखुपासून दूर ठेवले पाहिजे. सरकार केवळ सिगारेटवर कर वाढवते परंतु गुटखा तसेच अन्य तंबाखुजन्य पदार्थांकडे दुर्लक्ष करते. तंबाखुयुक्त पदार्थांवर कर वाढविणे हा एक उत्तम पर्याय आहे.गोव्यात दरवर्षी कर्करोगाचे १२00 नवे रुग्णदरम्यान, गोव्यात आतड्यांच्या आणि महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे गोवा कॅन्सर सोसायटीचे संयुक्त सचिव तथा आघाडीचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले. राज्यात दरवर्षी कर्करोगाचे १२00 नवे रुग्ण येतात आणि ६00 जणांचा कर्करोगाने मृत्यू होतो, अशी माहिती त्यांनी दिली. १२00 पैकी १५0 रुग्ण आतड्यांच्या कर्करोगाचे तर किमान २00 महिला रुग्ण स्तनाच्या कर्करोगाने त्रस्त असतात.स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी महिलांनी वयाच्या ३0 वर्षापूर्वी लग्न करुन मूल होऊ देणे तसेच सहा महिने ते दोन वर्षे मुलांना स्तनपान करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सर्वांनीच तंबाखु, दारु टाळणे, व्यायाम करणे, जलतरण, सायकल चालविणे, भरपूर भाज्या खाणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास ९0 टक्के रुग्ण पूर्णपणे बचावतात. दुसºया टप्प्यात ८0 टक्के, तिसºया टप्प्यात ५0 टक्के बचावतात तर चौथ्या टप्प्यात बचावण्याचे प्रमाण ५ टक्क्यांहून कमी असते,असे त्यांनी सांगितले.गोवा कॅन्सर सोसायटीने हाती घेतलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देताना संस्थेचे संयुक्त सचिव डॉ. शेखर साळकर यांनी २0१६-१७ या आर्थिक वर्षात ४१९ रुग्णांची संस्थेतर्फे तपासणी झाली. रुग्णांना ५0 हजार रुपयांपर्यंत खर्च संस्था देते आणि मणिपाल इस्पितळात शस्रक्रिया केल्यास आणखी ५0 हजार रुपये दिले जातात. गेल्या आर्थिक वर्षात मणिपाल इस्पितळात ३५ रुग्णांनी व इतर इस्पितळांमध्ये ८ रुग्णांनी मिळून एकूण १५ लाख रुपयांचा लाभ घेतला. २0१७-१८ या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत मणिपाल इस्पितळात १९ तर अन्य इस्पितळांमध्ये ५ रुग्णांनी मिळून ५ लाख रुपयांचा लाभ घेतला. अखेरच्या घटका मोजणाºया कर्करुग्णांसाठी काम करणाºया दिलासा केअर युनिटला १0 लाख रुपये देणगी दिली. संशोधनासाठी डॉ. अनुपमा मुखर्जी यांना ५ लाख रुपये संस्थेने पुरस्कृत केल्याची माहिती साळकर यांनी दिली.