शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

डोके आणि मानेच्या कर्करोगाचे रुग्ण एक-तृतियांश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 20:14 IST

एक-तृतियांश कर्करोग रुग्ण डोके आणि मानेच्या कॅन्सरने त्रस्त असतात, अशी माहिती मुंबईतील टाटा मेमोरियल इस्पितळाचे संचालक तथा आघाडीचे शल्यविशारद

पणजी : एक-तृतियांश कर्करोग रुग्ण डोके आणि मानेच्या कॅन्सरने त्रस्त असतात, अशी माहिती मुंबईतील टाटा मेमोरियल इस्पितळाचे संचालक तथा आघाडीचे शल्यविशारद डॉ. अनिल के. डिक्रुझ यांनी येथे दिली. बदलती जीवनशैली हे कारण आहेच, त्याचबरोबर ४0 ते ५0 टक्के रुग्णांना कर्करोग तंबाखु सेवनामुळेच होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तंबाखु सेवनावर नियंत्रणासाठी प्रभावी कायद्याची गरज त्यांनी व्यक्त केली तसेच तंबाखुजन्य पदार्थांवरील कर आणखी वाढविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.गोवा कॅन्सर सोसायटीने आयोजित केलेल्या उपक्रमांतर्गत गोमेकॉतील डॉक्टर, विद्यार्थी, सल्लागार डॉक्टर यांच्यासाठी त्यांनी व्याख्यान दिले. सुमारे ८0 डॉक्टर यात सहभागी झाले होते. डॉ. डिक्रुझ म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेचे एक अनुमान असे सांगते की पुढील १0 वर्षात विकसनशील देशांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दोन-तृतियांश होणार आहे. आजपावेतो विकसित देशांमध्ये प्रमाण जास्त आढळून आलेले आहे त्यास बदलती जीवनशैली हे कारण आहे. आता हे लोण विकसनशील देशांमध्येही पोचले आहे. शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तंबाखुपासून दूर ठेवले पाहिजे. सरकार केवळ सिगारेटवर कर वाढवते परंतु गुटखा तसेच अन्य तंबाखुजन्य पदार्थांकडे दुर्लक्ष करते. तंबाखुयुक्त पदार्थांवर कर वाढविणे हा एक उत्तम पर्याय आहे.गोव्यात दरवर्षी कर्करोगाचे १२00 नवे रुग्णदरम्यान, गोव्यात आतड्यांच्या आणि महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे गोवा कॅन्सर सोसायटीचे संयुक्त सचिव तथा आघाडीचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले. राज्यात दरवर्षी कर्करोगाचे १२00 नवे रुग्ण येतात आणि ६00 जणांचा कर्करोगाने मृत्यू होतो, अशी माहिती त्यांनी दिली. १२00 पैकी १५0 रुग्ण आतड्यांच्या कर्करोगाचे तर किमान २00 महिला रुग्ण स्तनाच्या कर्करोगाने त्रस्त असतात.स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी महिलांनी वयाच्या ३0 वर्षापूर्वी लग्न करुन मूल होऊ देणे तसेच सहा महिने ते दोन वर्षे मुलांना स्तनपान करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सर्वांनीच तंबाखु, दारु टाळणे, व्यायाम करणे, जलतरण, सायकल चालविणे, भरपूर भाज्या खाणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास ९0 टक्के रुग्ण पूर्णपणे बचावतात. दुसºया टप्प्यात ८0 टक्के, तिसºया टप्प्यात ५0 टक्के बचावतात तर चौथ्या टप्प्यात बचावण्याचे प्रमाण ५ टक्क्यांहून कमी असते,असे त्यांनी सांगितले.गोवा कॅन्सर सोसायटीने हाती घेतलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देताना संस्थेचे संयुक्त सचिव डॉ. शेखर साळकर यांनी २0१६-१७ या आर्थिक वर्षात ४१९ रुग्णांची संस्थेतर्फे तपासणी झाली. रुग्णांना ५0 हजार रुपयांपर्यंत खर्च संस्था देते आणि मणिपाल इस्पितळात शस्रक्रिया केल्यास आणखी ५0 हजार रुपये दिले जातात. गेल्या आर्थिक वर्षात मणिपाल इस्पितळात ३५ रुग्णांनी व इतर इस्पितळांमध्ये ८ रुग्णांनी मिळून एकूण १५ लाख रुपयांचा लाभ घेतला. २0१७-१८ या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत मणिपाल इस्पितळात १९ तर अन्य इस्पितळांमध्ये ५ रुग्णांनी मिळून ५ लाख रुपयांचा लाभ घेतला. अखेरच्या घटका मोजणाºया कर्करुग्णांसाठी काम करणाºया दिलासा केअर युनिटला १0 लाख रुपये देणगी दिली. संशोधनासाठी डॉ. अनुपमा मुखर्जी यांना ५ लाख रुपये संस्थेने पुरस्कृत केल्याची माहिती साळकर यांनी दिली.