शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
7
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
8
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
9
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
10
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
11
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
12
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
13
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
14
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
15
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
16
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
17
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
18
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
19
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
20
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

सरकारचे कर्ज ४ हजार कोटींवर

By admin | Updated: August 25, 2014 00:54 IST

सरकारने खुल्या बाजारातून उचललेले कर्ज ४ हजार ६३७ कोटी ५२ लाख रुपयांवर पोचले आहे.

पणजी : सरकारने खुल्या बाजारातून उचललेले कर्ज ४ हजार ६३७ कोटी ५२ लाख रुपयांवर पोचले आहे. नजीकच्या काळात आणखी तीनेकशे कोटींचे रोखे काढले जाणार आहेत. राज्य सरकारच्या डोक्यावर एकूण ९ हजार ३२ कोटी ५६ लाख रुपये कर्ज आहे. आर्थिक कसरती करताना दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्ज उचलावे लागत आहे. आधीच मोठ्या प्रमाणात खुल्या बाजारातून अशा प्रकारच्या कर्जाची उचल झालेली असल्याने आगामी काळात देय रक्कम बाहेर काढताना सरकारला ते बरेच महागात पडणार आहे. नजीकच्या काळात लाभांशासह देय असलेल्या रोख्यांवर दीडेक हजार कोटी रुपये सरकारला तिजोरीतून बाहेर काढावे लागतील, अशी माहिती वित्त खात्यातील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सरकारने वेळोवेळी १३.०५ टक्क्यांपर्यंत व्याजाने रोख्यांद्वारे दहा ते पंधरा वर्षांच्या मुदतीसाठी कर्ज घेतलेले आहे. अधिकृत माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षातच १३२ कोटी, २०१५-१६ या वर्षात १६५ कोटी, २०१६-१७ या वर्षात १४८ कोटी, तर २०१७-१८ मध्ये तब्बल ४०० कोटी रुपये सरकारला देय असलेल्या रोख्यांपोटी बाहेर काढावे लागतील. वित्त खात्यातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मंजूर मर्यादेतच हे कर्ज उचलण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)