शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

कॅसिनोवरून सरकार लक्ष्य

By admin | Updated: April 3, 2016 15:52 IST

मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोप्रश्नी सरकारला सध्या सर्वच थरांमधून टीकेस सामोरे जावे लागत आहे.

ऑनलाइन लोकमत 
पणजी, दि. ३ -  मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोप्रश्नी सरकारला सध्या सर्वच थरांमधून टीकेस सामोरे जावे लागत आहे. अपक्ष आमदार रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी शनिवारी जोरदार हल्ला चढवत सरकार कॅसिनो लॉबीचे एजंट बनल्याचा आरोप केला.
खंवटे व सावळ यांनी शनिवारी येथे संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. खंवटे म्हणाले की, कॅसिनोप्रश्नी सरकारने घेतलेला निर्णय ही गोमंतकीय जनतेची फार मोठी फसवणूक आहे. कॅसिनोंना पर्यायी जागा शोधतोय, असे सरकार सांगून गोमंतकीयांशी गेम खेळत आहे. कॅसिनोंसाठी पर्यायी जागा शोधणे ही कॅसिनो मालकांची जबाबदारी आहे; पण सरकार कॅसिनोंचे एजंट बनल्यामुळे सरकारच जागा शोधत असल्याचे सांगते. एखाद्या उद्योजकाचा डिचोलीतील उद्योग जर आजारी झाला व तो चालेनासा झाला, तर त्या उद्योगाला दुसर्‍या शहरात जागा कधी सरकार शोधून देते का, ते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अगोदर सांगावे.
खंवटे म्हणाले की, कॅसिनोंसाठी गेमिंग आयोग नेमण्याचे आश्‍वासन चार वर्षांपूर्वी सरकारने दिले होते; पण सरकार आता या आयोगाच्या नियुक्तीबाबत काहीच बोलत नाही. मांडवीतील कॅसिनोंना आपण जमिनीवर जागा देऊ, अशी भाषा सरकार करते. आम्ही या प्रकारास पूर्णपणे विरोध करू. जमिनींवर म्हणजे हॉटेलमध्ये अगोदरच कॅसिनो खूप चालत आहेत. त्यात आणखी भर नको. मांडवीतील कॅसिनोंना सरकारने खोल समुद्रातच पाठवावे. आणखी यू-टर्न घेऊ नयेत. सध्या निवडणुकीचे वर्ष असल्याने विविध प्रकारे निवडणूक निधी उभा करण्याचेच काम सरकार करत आहे. 
 
गोविपा'ने काढला पाठिंबा
मडगाव : गेल्या चार वर्षांत भाजप सरकारने आपली पाच टक्के आश्‍वासनेही पूर्ण केलेली नाहीत, अशी खरमरीत टीका सत्ताधारी भाजप पक्षाचा सहकारी पक्ष असलेल्या गोवा विकास पार्टीचे सर्वेसर्वा मिकी पाशेको यांनी केली आहे. या सरकारला आपण पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपची लोकविरोधी धोरणे पाहून मी हा पाठिंबा काढून घेतला आहे, असे ते म्हणाले. गेल्या चार वर्षांत या सरकारने फक्त 'यू टर्न' घेतले आहेत. मांडवीतून कॅसिनो हलवण्याबाबतही या सरकारने तेच केले आहे. कारण कॅसिनो उद्योगाकडून भाजपला निवडणुकीचा निधी मिळत असल्यामुळे ते या उद्योगाला हात लावू शकत नाहीत, असे ते म्हणाले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यातील ८५ टक्के आश्‍वासने पूर्ण केली आहेत, असा दावा केला असला, तरी त्यात तथ्य नाही. या सरकारने ५ टक्केही आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे आपला गोविपा पक्ष भाजपपासून दोन हात दूर राहणे पसंत करेल, असे ते म्हणाले.