शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

सरकारने क्लॉडचे आभार मानावेत

By admin | Updated: December 10, 2015 01:54 IST

पणजी : सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराविरुद्ध न्यायालयात जाणाऱ्या पर्यावरणप्रेमींनाही सरकार आता टार्गेट करू लागले आहे, हे

पणजी : सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराविरुद्ध न्यायालयात जाणाऱ्या पर्यावरणप्रेमींनाही सरकार आता टार्गेट करू लागले आहे, हे धक्कादायक आहे. डॉ. क्लॉड आल्वारीस यांनी यापूर्वी न्यायालयात धाव घेतल्यामुळेच १५ दशलक्ष टन खनिज मालाची मालकी सरकारजवळ आली आणि सरकारला आतापर्यंत ७५० कोटींचा महसूलही प्राप्त झाला. याबाबत खरे म्हणजे गोवा सरकारने आल्वारीस यांचे आभार मानायला हवेत, असा सल्ला काँग्रेसचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी दिला आहे. मडकईकर म्हणाले की, आल्वारीस यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले जोडप्रतिज्ञापत्र हे अनेक गोष्टी स्पष्ट करते. आल्वारीस यांच्यामुळे गोव्याच्या खाणी बंद पडल्या नाहीत; कारण आल्वारीस हे न्यायालयात जाण्यापूर्वी गोवा विधानसभेत ज्यांनी गोव्यात सगळे खाण घोटाळेच सुरू आहेत असे सातत्याने आरोप केले, त्या आरोपांमुळे गोव्याच्या खाण क्षेत्राबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गोवा म्हणजे बेकायदा खाण व्यवसायच, असे समीकरण २०१२ च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन विरोधकांनी केले होते. तीच संधी पर्यावरणप्रेमींनी साधली व आल्वारीस यांच्यासारखे अभ्यासक मग न्यायालयात गेले. गोव्यात कायदेशीर खाण व्यवसाय सुरू राहायला हवा. मात्र, खाण क्षेत्रातील बेबंदशाही व सत्ताधाऱ्यांचा गैरकारभार याविरुद्ध न्यायालयात गेलेले याचिकादार आल्वारीस यांना सरकारने लक्ष्य बनविणे ही समाजातील सर्वच जागृत घटकांसाठी अत्यंत धोक्याची गोष्ट आहे. (प्रतिनिधी)