शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

सरकारने क्लॉडचे आभार मानावेत

By admin | Updated: December 10, 2015 01:54 IST

पणजी : सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराविरुद्ध न्यायालयात जाणाऱ्या पर्यावरणप्रेमींनाही सरकार आता टार्गेट करू लागले आहे, हे

पणजी : सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराविरुद्ध न्यायालयात जाणाऱ्या पर्यावरणप्रेमींनाही सरकार आता टार्गेट करू लागले आहे, हे धक्कादायक आहे. डॉ. क्लॉड आल्वारीस यांनी यापूर्वी न्यायालयात धाव घेतल्यामुळेच १५ दशलक्ष टन खनिज मालाची मालकी सरकारजवळ आली आणि सरकारला आतापर्यंत ७५० कोटींचा महसूलही प्राप्त झाला. याबाबत खरे म्हणजे गोवा सरकारने आल्वारीस यांचे आभार मानायला हवेत, असा सल्ला काँग्रेसचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी दिला आहे. मडकईकर म्हणाले की, आल्वारीस यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले जोडप्रतिज्ञापत्र हे अनेक गोष्टी स्पष्ट करते. आल्वारीस यांच्यामुळे गोव्याच्या खाणी बंद पडल्या नाहीत; कारण आल्वारीस हे न्यायालयात जाण्यापूर्वी गोवा विधानसभेत ज्यांनी गोव्यात सगळे खाण घोटाळेच सुरू आहेत असे सातत्याने आरोप केले, त्या आरोपांमुळे गोव्याच्या खाण क्षेत्राबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गोवा म्हणजे बेकायदा खाण व्यवसायच, असे समीकरण २०१२ च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन विरोधकांनी केले होते. तीच संधी पर्यावरणप्रेमींनी साधली व आल्वारीस यांच्यासारखे अभ्यासक मग न्यायालयात गेले. गोव्यात कायदेशीर खाण व्यवसाय सुरू राहायला हवा. मात्र, खाण क्षेत्रातील बेबंदशाही व सत्ताधाऱ्यांचा गैरकारभार याविरुद्ध न्यायालयात गेलेले याचिकादार आल्वारीस यांना सरकारने लक्ष्य बनविणे ही समाजातील सर्वच जागृत घटकांसाठी अत्यंत धोक्याची गोष्ट आहे. (प्रतिनिधी)