पणजी : गोव्याचे लागवड क्षेत्र सर्वसाधारणपणे ३ हजार हेक्टरने घटल्याचे नाबार्डने म्हटले आहे. शेतकऱ्यांमध्ये कृषी कर्ज उचलण्याच्या बाबतीतही उदासीनता दिसून आली असून जागृतीचा अभाव हे याचे कारण मानले जाते. कृषी तसेच प्राधान्य क्षेत्रातील व्यवसायासाठी येत्या आर्थिक वर्षात ५0३७ कोटी रुपये कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट नाबार्डने ठेवले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ते २६ टक्क्यांनी जास्त आहे. नाबार्डने कृषी बाबतीत ‘स्टेट फोकस पेपर’ तयार केलेला असून त्यातील ठळक वैशिष्ट्यांच्या बाबतीत गुरुवारी पणजीतील एका हॉटेलात सादरीकरण झाले. नाबार्ड आयोजित राज्य पत परिषदेत नाबार्डचे सरव्यवस्थापक बी. बी. सेठी अध्यक्षस्थानी होते. प्रधान सचिव आर. के. श्रीवास्तव, रिझर्व्ह बँकेचे विभागीय संचालक एस. रामस्वामी, भारतीय स्टेट बँकेचे उपसरव्यवस्थापक इंदू शेखर, राज्य सहकारी बँकेचे चेअरमन उल्हास फळदेसाई, वित्त खात्याच्या संयुक्त सचिव मीनाक्षी गाड, भारतीय कृषी संशोधन केंद्राचे संचालक एन. पी. सिंह उपस्थित होते. कृषी क्षेत्रात लघू मुदतीचे तसेच गुंतवणूक पत याबाबत ९९७ कोटी रुपये तसेच प्राधान्य क्षेत्रातील इतर व्यवसायासाठी ३३८६ कोटी रुपये कर्ज देण्याचे नाबार्डचे उद्दिष्ट आहे. २0१३-१४ या आर्थिक वर्षात कृषी कर्जाच्या बाबतीत शेतकऱ्यांकडून उदासीनता दिसून आली. उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ८0 टक्के कर्जाची उचल झाली. २0१२-१३ आर्थिक वर्षात पीक कर्ज उद्दिष्टाच्या १९५ टक्के इतके वितरित झाले. मुदत कर्ज २0१२-१३ या आर्थिक वर्षात १२१ टक्के वितरित झाले तर २0१३-१४ आर्थिक वर्षात हे प्रमाण घसरून ९४ टक्क्यांवर आले. (पान २ वर)
गोव्याचे लागवड क्षेत्र ३ हजार हेक्टरने घटले
By admin | Updated: January 9, 2015 02:14 IST