शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

गोव्याचे लागवड क्षेत्र ३ हजार हेक्टरने घटले

By admin | Updated: January 9, 2015 02:14 IST

प्राधान्य क्षेत्रात ५0३७ कोटी कर्ज वितरणाचे नाबार्डचे उद्दिष्ट

पणजी : गोव्याचे लागवड क्षेत्र सर्वसाधारणपणे ३ हजार हेक्टरने घटल्याचे नाबार्डने म्हटले आहे. शेतकऱ्यांमध्ये कृषी कर्ज उचलण्याच्या बाबतीतही उदासीनता दिसून आली असून जागृतीचा अभाव हे याचे कारण मानले जाते. कृषी तसेच प्राधान्य क्षेत्रातील व्यवसायासाठी येत्या आर्थिक वर्षात ५0३७ कोटी रुपये कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट नाबार्डने ठेवले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ते २६ टक्क्यांनी जास्त आहे. नाबार्डने कृषी बाबतीत ‘स्टेट फोकस पेपर’ तयार केलेला असून त्यातील ठळक वैशिष्ट्यांच्या बाबतीत गुरुवारी पणजीतील एका हॉटेलात सादरीकरण झाले. नाबार्ड आयोजित राज्य पत परिषदेत नाबार्डचे सरव्यवस्थापक बी. बी. सेठी अध्यक्षस्थानी होते. प्रधान सचिव आर. के. श्रीवास्तव, रिझर्व्ह बँकेचे विभागीय संचालक एस. रामस्वामी, भारतीय स्टेट बँकेचे उपसरव्यवस्थापक इंदू शेखर, राज्य सहकारी बँकेचे चेअरमन उल्हास फळदेसाई, वित्त खात्याच्या संयुक्त सचिव मीनाक्षी गाड, भारतीय कृषी संशोधन केंद्राचे संचालक एन. पी. सिंह उपस्थित होते. कृषी क्षेत्रात लघू मुदतीचे तसेच गुंतवणूक पत याबाबत ९९७ कोटी रुपये तसेच प्राधान्य क्षेत्रातील इतर व्यवसायासाठी ३३८६ कोटी रुपये कर्ज देण्याचे नाबार्डचे उद्दिष्ट आहे. २0१३-१४ या आर्थिक वर्षात कृषी कर्जाच्या बाबतीत शेतकऱ्यांकडून उदासीनता दिसून आली. उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ८0 टक्के कर्जाची उचल झाली. २0१२-१३ आर्थिक वर्षात पीक कर्ज उद्दिष्टाच्या १९५ टक्के इतके वितरित झाले. मुदत कर्ज २0१२-१३ या आर्थिक वर्षात १२१ टक्के वितरित झाले तर २0१३-१४ आर्थिक वर्षात हे प्रमाण घसरून ९४ टक्क्यांवर आले. (पान २ वर)