शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'तामनार'वर सरकार ठाम; वनीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2024 11:47 IST

भरपाईसाठी निर्णय : सांगोडमध्ये जमीन राखीव

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : तामनार वीज प्रकल्पाबाबत सरकार ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागणार असल्याने होत असलेला विरोध पाहता सरकारने भरपाई म्हणून वनीकरणासाठी सांगोड- धारबांदोडा येथे १७.२२८ हेक्टर जमीन राखीव वनक्षेत्र म्हणून अधिसूचित केली आहे.

वनखात्याने यासंबंधीची अधिसूचना जारी केलेली आहे. तामनार वीजवाहिन्या मोले अभयारण्यातून येत असल्याने वृक्षतोड करावी लागणार आहे. पर्यावरणप्रेमी त्यामुळे नाराज आहेत. दक्षिण गोव्यात ज्या तीन वादग्रस्त प्रकल्पांना विरोध केला जात आहे. त्यात तामनार प्रकल्पाचाही समावेश आहे. तामनार प्रकल्प नकोच, अशी भूमिका लोकांनी तसेच एनजीओंनी घेतलेली आहे. या तीन वादग्रस्त प्रकल्पांना विरोध करण्यासाठी दक्षिण गोव्यात याआधी आंदोलनेही झालेली आहेत.

नुकत्याच गोव्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास तामनार प्रकल्प मोडीत काढण्याचे आश्वासन दिलेले आहे. सावंत सरकार मात्र हा प्रकल्प पुढे नेण्याबाबत ठाम आहे. तामनारहून येणारी ४०० केव्ही क्षमतेची ही वीजवाहिनी कर्नाटकात धारवाड येथील नरेंद्र पॉवरग्रीडपासून सुरू होऊन गोव्यातील शेल्डे व पुढे म्हापशापर्यंत येणार आहे. 

हा प्रकल्प झाल्यानंतर १२०० मेगावॅट वीज गोव्याला मिळणार आहे. या वीज वाहिनीसाठी ७८.२९७ हेक्टर जमीन वळवावी लागणार आहे. या भागात वृक्षतोड करावी लागणार असल्याने १७.२२८ हेक्टर अर्थात १.७२ लाख चौरस मीटर जमिनीत भरपाई म्हणून वनिकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्या अनुषंगाने सांगोड, धारबांदोडा येथील सर्वे क्रमांक २१/१, २२/१ व २४/१ अ जमीन वनीकरणासाठी अधिसूचित केली आहे.

दरम्यान, कर्नाटकने पश्चिम घाटातून वीजवाहिनी नेण्यास गोव्याला परवानगी नाकारली आहे. म्हादई प्रश्नी गोवा-कर्नाटक वाद शिगेला पोहोचला असतानाच वीजवाहिनीही कर्नाटकने रोखली. या वीज वाहिनीला राष्ट्रीय वन्यप्राणी मंडळाकडून अजून परवानगी मिळालेली नाही, असे कर्नाटकने म्हटले आहे

दरम्यान, कर्नाटकातच जर हा प्रकल्प रद्द झाला तर गोव्याची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक वाया जाईल, त्यामुळे गोव्याने हा प्रकल्पच रद्द करावा, अशी विरोधकांची मागणी आहे.

सरकार म्हणते...

राज्यात वीज खात्याने मतदारसंघात किमान ४० कोटी रुपयांची अतिरिक्त कामे हाती घेतलेली आहेत. राज्यात विजेची गरज ६२८ मेगावॅट आहे. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने कालांतराने विजेची गरज वाढतच जाणार आहे. त्यामुळे तामनार प्रकल्पाची गरज असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. विजेची गरज भागवण्यासाठी २०३० पर्यंत राज्यात १५० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करण्याचे सरकारचे ध्येय आहे.

७५ टक्के काम पूर्ण झालेय, आता माघार नाही : ढवळीकर

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कर्नाटकने या प्रकल्पाबाबत माघार घेतली तरी गोव्याला ते शक्य नाही. आमचे ७५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. वास्तविक डिसेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण व्हायला हवे होते. तामनारच्या निमित्ताने गोव्यात पायाभूत सुविधा उभ्या राहिलेल्या आहेत. उद्या तामनार नाही झाला तरी इतर ठिकाणाहून वीज घेताना त्या वापरता येतील. कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेवर असल्याने बहुधा गोव्याची अशी अडवणूक चालली असावी. तामनार वीज वाहिन्या गोव्यात आल्यास १२०० मेगावॅट वीज गोव्याला मिळणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाelectricityवीज