शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

'तामनार'वर सरकार ठाम; वनीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2024 11:47 IST

भरपाईसाठी निर्णय : सांगोडमध्ये जमीन राखीव

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : तामनार वीज प्रकल्पाबाबत सरकार ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागणार असल्याने होत असलेला विरोध पाहता सरकारने भरपाई म्हणून वनीकरणासाठी सांगोड- धारबांदोडा येथे १७.२२८ हेक्टर जमीन राखीव वनक्षेत्र म्हणून अधिसूचित केली आहे.

वनखात्याने यासंबंधीची अधिसूचना जारी केलेली आहे. तामनार वीजवाहिन्या मोले अभयारण्यातून येत असल्याने वृक्षतोड करावी लागणार आहे. पर्यावरणप्रेमी त्यामुळे नाराज आहेत. दक्षिण गोव्यात ज्या तीन वादग्रस्त प्रकल्पांना विरोध केला जात आहे. त्यात तामनार प्रकल्पाचाही समावेश आहे. तामनार प्रकल्प नकोच, अशी भूमिका लोकांनी तसेच एनजीओंनी घेतलेली आहे. या तीन वादग्रस्त प्रकल्पांना विरोध करण्यासाठी दक्षिण गोव्यात याआधी आंदोलनेही झालेली आहेत.

नुकत्याच गोव्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास तामनार प्रकल्प मोडीत काढण्याचे आश्वासन दिलेले आहे. सावंत सरकार मात्र हा प्रकल्प पुढे नेण्याबाबत ठाम आहे. तामनारहून येणारी ४०० केव्ही क्षमतेची ही वीजवाहिनी कर्नाटकात धारवाड येथील नरेंद्र पॉवरग्रीडपासून सुरू होऊन गोव्यातील शेल्डे व पुढे म्हापशापर्यंत येणार आहे. 

हा प्रकल्प झाल्यानंतर १२०० मेगावॅट वीज गोव्याला मिळणार आहे. या वीज वाहिनीसाठी ७८.२९७ हेक्टर जमीन वळवावी लागणार आहे. या भागात वृक्षतोड करावी लागणार असल्याने १७.२२८ हेक्टर अर्थात १.७२ लाख चौरस मीटर जमिनीत भरपाई म्हणून वनिकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्या अनुषंगाने सांगोड, धारबांदोडा येथील सर्वे क्रमांक २१/१, २२/१ व २४/१ अ जमीन वनीकरणासाठी अधिसूचित केली आहे.

दरम्यान, कर्नाटकने पश्चिम घाटातून वीजवाहिनी नेण्यास गोव्याला परवानगी नाकारली आहे. म्हादई प्रश्नी गोवा-कर्नाटक वाद शिगेला पोहोचला असतानाच वीजवाहिनीही कर्नाटकने रोखली. या वीज वाहिनीला राष्ट्रीय वन्यप्राणी मंडळाकडून अजून परवानगी मिळालेली नाही, असे कर्नाटकने म्हटले आहे

दरम्यान, कर्नाटकातच जर हा प्रकल्प रद्द झाला तर गोव्याची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक वाया जाईल, त्यामुळे गोव्याने हा प्रकल्पच रद्द करावा, अशी विरोधकांची मागणी आहे.

सरकार म्हणते...

राज्यात वीज खात्याने मतदारसंघात किमान ४० कोटी रुपयांची अतिरिक्त कामे हाती घेतलेली आहेत. राज्यात विजेची गरज ६२८ मेगावॅट आहे. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने कालांतराने विजेची गरज वाढतच जाणार आहे. त्यामुळे तामनार प्रकल्पाची गरज असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. विजेची गरज भागवण्यासाठी २०३० पर्यंत राज्यात १५० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करण्याचे सरकारचे ध्येय आहे.

७५ टक्के काम पूर्ण झालेय, आता माघार नाही : ढवळीकर

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कर्नाटकने या प्रकल्पाबाबत माघार घेतली तरी गोव्याला ते शक्य नाही. आमचे ७५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. वास्तविक डिसेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण व्हायला हवे होते. तामनारच्या निमित्ताने गोव्यात पायाभूत सुविधा उभ्या राहिलेल्या आहेत. उद्या तामनार नाही झाला तरी इतर ठिकाणाहून वीज घेताना त्या वापरता येतील. कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेवर असल्याने बहुधा गोव्याची अशी अडवणूक चालली असावी. तामनार वीज वाहिन्या गोव्यात आल्यास १२०० मेगावॅट वीज गोव्याला मिळणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाelectricityवीज