शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

वीजही महागल्याने गोवेकरांत संताप

By admin | Updated: April 17, 2015 02:02 IST

पणजी : वीज भाड्यात १ एप्रिलपासून १४ टक्के वाढ लागू झाली असून यामुळे आम आदमीच्या खिशाला आणखी फटका बसणार आहे.

पणजी : वीज भाड्यात १ एप्रिलपासून १४ टक्के वाढ लागू झाली असून यामुळे आम आदमीच्या खिशाला आणखी फटका बसणार आहे. पाणीपट्टीत दुपटीने केलेल्या वाढीपाठोपाठ आता वीजही महागल्याने ही भाडेवाढ कंबरडे मोडणारी ठरली असून लोक सरकारच्या नावाने बोटे मोडत आहेत. सरकार या ना त्या प्रकारे जनतेच्या खिशातून पैसा बाहेर काढू पाहात आहे. संयुक्त वीज नियमन आयोगाकडे वीज खात्याने १९ टक्के वाढ मागितली होती; परंतु ती १४ टक्के देण्यात आली. आयोगाच्या शिफारशीवर सार्वजनिक सुनावणी घेण्यात आली, तेव्हा लोकांनी भाडेवाढीस जोरदार विरोध केला. सध्या पहिल्या ६० युनिटकरिता प्रती युनिट १.२० रुपये आकारले जातात. ६१ ते २५० युनिटकरिता १.७० रुपये आकारण्यात येतात. २५१ ते ५०० युनिटपर्यंत २.७५ रुपये, तर ५०० पेक्षा जास्त युनिट झाल्यास ३.२० रुपये आकारले जातात. नव्या दरानुसार आता १०० युनिटपर्यंत १.३० रुपये, १०१ ते २०० युनिटपर्यंत १.९० रुपये, २०१ ते ४०० युनिटपर्यंत ३.१० रुपये, तर ४०० पेक्षा जास्त युनिट झाल्यास ३.६० रुपये आकारले जातील. गेल्या महिन्यात जनसुनावणीत वितरणातील वीज गळतीचा प्रश्नही उपस्थित झाला होता. २०१३ साली वीज गळती १२.७५ टक्के होती, त्यात वाढ होऊन आता १५.५ टक्के झालेली आहे. घरांमध्ये तसेच रस्त्यांवर वीज बचत करणाऱ्या दिव्यांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम राबवले जातील. (प्रतिनिधी)