शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

कूळ कायदा; भाजपवर दबाव

By admin | Updated: May 17, 2015 00:51 IST

पणजी : राज्यातील बहुजन समाज हा भारतीय जनता पक्षाचा पाया होता व आहे. मात्र, कूळ कायदा दुरुस्त करून सरकारने बहुजनांना अस्वस्थ केले.

पणजी : राज्यातील बहुजन समाज हा भारतीय जनता पक्षाचा पाया होता व आहे. मात्र, कूळ कायदा दुरुस्त करून सरकारने बहुजनांना अस्वस्थ केले. या दुरुस्त्या महागात पडणार असल्याने त्या मागे घेणे राजकीयदृष्ट्या योग्य ठरेल, याची जाणीव भाजपच्या काही आमदारांनी पक्षाचे केंद्रीय सहसंघटन मंत्री सतिश वेलणकर यांना दिली.आमदारांची मते आणि सूचना ऐकून भाजपवर एक प्रकारे कूळ कायदा दुरुस्त्यांप्रश्नी दबाव आला आहे. या दुरुस्त्या रद्द होणे गरजेचे आहे, याची जाणीव पक्षाला होऊ लागली आहे. दोन दिवस अनेक आमदारांकडे वेलणकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चर्चा केली. म.गो.पक्षाविषयीही वेलणकर व पर्रीकर यांच्याशी काही आमदार बोलले. सांतआंद्रेचे आमदार विष्णू वाघ हे वेलणकर यांच्याजवळ जास्त स्पष्ट बोलले.राज्यात विविध समाजांचा मिळून बहुजन महासंघ स्थापन झाला आहे. कूळ कायद्यातील दुरुस्त्यांमुळे बहुजन समाज दुखावला आहे, असा मुद्दा वाघ यांनी मांडला. कूळ कायद्याला सरकारने हात लावू नये, तळागाळातील लोक संतप्त बनतील असे मी पूर्वीपासून सांगत होतो. आता तोच अनुभव येऊ लागला आहे. केवळ सनसेट कलमच नव्हे तर कूळ कायद्यात भाजप सरकारने केलेल्या सगळ््याच दुरुस्त्या मागे घ्याव्यात, असा मुद्दा वाघ यांनी मांडला. पर्रीकर यांच्यासमोरही त्यांनी हाच मुद्दा मांडला. न्यायालयाकडे खटले सोपविणे चुकीचे आहे, असे वाघ म्हणाले. आपल्याला कोणताही अहंकार नाही, कूळ कायद्यातील दुरुस्त्यांबाबत फेरविचार करता येईल, असे पर्रीकर यांनी वाघ यांना सांगितले. वाघ, मायकल लोबो वगैरे शनिवारीच वेलणकर व पर्रीकर यांना भेटले. (खास प्रतिनिधी)