शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कूळ कायदा; भाजपवर दबाव

By admin | Updated: May 17, 2015 00:51 IST

पणजी : राज्यातील बहुजन समाज हा भारतीय जनता पक्षाचा पाया होता व आहे. मात्र, कूळ कायदा दुरुस्त करून सरकारने बहुजनांना अस्वस्थ केले.

पणजी : राज्यातील बहुजन समाज हा भारतीय जनता पक्षाचा पाया होता व आहे. मात्र, कूळ कायदा दुरुस्त करून सरकारने बहुजनांना अस्वस्थ केले. या दुरुस्त्या महागात पडणार असल्याने त्या मागे घेणे राजकीयदृष्ट्या योग्य ठरेल, याची जाणीव भाजपच्या काही आमदारांनी पक्षाचे केंद्रीय सहसंघटन मंत्री सतिश वेलणकर यांना दिली.आमदारांची मते आणि सूचना ऐकून भाजपवर एक प्रकारे कूळ कायदा दुरुस्त्यांप्रश्नी दबाव आला आहे. या दुरुस्त्या रद्द होणे गरजेचे आहे, याची जाणीव पक्षाला होऊ लागली आहे. दोन दिवस अनेक आमदारांकडे वेलणकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चर्चा केली. म.गो.पक्षाविषयीही वेलणकर व पर्रीकर यांच्याशी काही आमदार बोलले. सांतआंद्रेचे आमदार विष्णू वाघ हे वेलणकर यांच्याजवळ जास्त स्पष्ट बोलले.राज्यात विविध समाजांचा मिळून बहुजन महासंघ स्थापन झाला आहे. कूळ कायद्यातील दुरुस्त्यांमुळे बहुजन समाज दुखावला आहे, असा मुद्दा वाघ यांनी मांडला. कूळ कायद्याला सरकारने हात लावू नये, तळागाळातील लोक संतप्त बनतील असे मी पूर्वीपासून सांगत होतो. आता तोच अनुभव येऊ लागला आहे. केवळ सनसेट कलमच नव्हे तर कूळ कायद्यात भाजप सरकारने केलेल्या सगळ््याच दुरुस्त्या मागे घ्याव्यात, असा मुद्दा वाघ यांनी मांडला. पर्रीकर यांच्यासमोरही त्यांनी हाच मुद्दा मांडला. न्यायालयाकडे खटले सोपविणे चुकीचे आहे, असे वाघ म्हणाले. आपल्याला कोणताही अहंकार नाही, कूळ कायद्यातील दुरुस्त्यांबाबत फेरविचार करता येईल, असे पर्रीकर यांनी वाघ यांना सांगितले. वाघ, मायकल लोबो वगैरे शनिवारीच वेलणकर व पर्रीकर यांना भेटले. (खास प्रतिनिधी)