शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वीज बिलांच्या दुरुस्तीचे त्रांगड

By admin | Updated: May 20, 2015 01:46 IST

पणजी : राज्यातील वीज बिलांमध्ये खात्याकडून व गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडूनही प्रचंड चुका करण्यात आलेल्या असून या चुकांमुळे वीज

पणजी : राज्यातील वीज बिलांमध्ये खात्याकडून व गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडूनही प्रचंड चुका करण्यात आलेल्या असून या चुकांमुळे वीज ग्राहक हैराण झाले आहेत. बिलांमध्ये दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे; पण तेही तापदायक बनल्याने ग्राहक जेरीस आले आहेत.वीज खात्याने पूर्वी वीज बिलांचे काम हे बंगळुरू येथील एका कंपनीकडे सोपविले होते. त्या कंपनीने घोळ घातल्यानंतर बिलांचा विषय वीज खात्याने गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडे (जीईएल) सोपविला. तथापि, जीईएलही काहीच उपाय काढू शकले नाही. उलट अजूनही हजारो रुपयांची वीज बिले ग्राहकांना येत आहे. ज्यांना दरमहा केवळ पाचशे-सहाशे रुपयांचेवीज बिल येत होते, त्यांना आता सात-आठ हजारांचे बिल येऊ लागले आहे. हे बिल दुरुस्त करून घेण्यासाठी ग्राहकांना वीज खात्याच्या कार्यालयांमध्ये व जीईएलमध्येही खेपा माराव्या लागत आहेत.वीज कार्यालयात गेल्यानंतर अभियंते ग्राहकासोबत घरी येतात. ते वीज मीटरची पाहणी करतात व मग वीज बिल कपातीसाठी दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होते. या सगळ्यात ग्राहकाचा वेळ वाया जातो; कारण केवळ एकदा खेप मारली म्हणून अभियंते घरी येत नाहीत. त्यांच्याकडे दोन-तीनवेळा खेपा माराव्या लागतात. वीज बिल कमी करून दिले तरी ते एकदम कमीही होत नाही. पाच हजारांचे बिल आले, तर दोन हजार रुपयांपर्यंत कमी करून दिले जाते; पण प्रत्यक्षात ज्या ग्राहकाला दर महिन्यास केवळ पाचशे रुपयांचे वीज बिल यायचे, त्याने पाच हजार रुपये का भरावेत, असा प्रश्न ग्राहक उपस्थित करतात.वीज बिलांमधील चुकांचा हा घोळ गेले तीन महिने सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा भुर्दंड बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी याविषयी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना संताप व्यक्त केला. सामान्य माणसांचे कंबरडे वीज बिलांनी मोडून टाकले आहे, असे डिमेलो म्हणाले. तुमचा मीटर सदोष आहे, असेही अनेकदा वीज खाते लोकांना सांगते. वीज मीटर नादुरुस्त असेल, तर ती चूक खात्याची आहे. त्यांनीच तो दिलेला आहे, असे डिमेलो म्हणाले. वीज खात्याच्या सर्व कार्यालयांमध्ये बिलांबाबत प्रचंड गोंधळ आहे, असेही ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)े