शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

गोव्यात सर्वाना मुक्त प्रवेश मिळणार; ताप असल्यासच चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:58 IST

गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची कोविड चाचणी होणार नाही, तापासारखी लक्षणे दिसली तरच चाचणी

पणजी : राज्यात मोठ्या प्रमाणात लोकांचे येणो सुरू झाले आहे. रेल्वे, विमाने किंवा रस्तामार्गे जे लोक गोव्यात येतील, त्यांना यापुढे मुक्त प्रवेश मिळणार आहे. यापुढे नवी प्रक्रिया (एसओपी) लागू होणार आहे. त्यानुसार गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची कोविड चाचणी होणार नाही, तापासारखी लक्षणे दिसली तरच चाचणी केली जाणार आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सकाळी सर्व मंत्र्यांची बैठक घेतली. मांगोरहीलच्या प्रकरणामुळे कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढतात व दुसऱ्या बाजूने सगळे व्यवहारही सुरू होत असल्याने परराज्यातून बरेच प्रवासी गोव्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री व आमदारांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. कडक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा बहुतेक मंत्र्यांनी व्यक्त केली. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी वास्कोत पूर्ण लॉकडाऊन केले जावे असा मुद्दा मांडला. मात्र आरोग्य मंत्री विश्वजित राणे, विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी वेगळी भूमिका मांडली. एका विशिष्ट भागात कोरोना रुग्ण आढळले म्हणून पूर्ण शहरात लॉकडाऊन करण्याची गरज नाही. तसे झाल्यास लोक आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अडचणीत येतील, सगळे व्यवहार कायम बंद ठेवणे योग्य नव्हे असे लोबो व राणे म्हणाले.नवीन एसओपी येणारयापुढे राज्यात नवीन एसओपी लागू करण्याचे मंत्र्यांच्या बैठकीत तत्त्वत: ठरले आहे. गोव्यात रेल्वे, रस्तामार्गे किंवा विमानातून जे कुणी येतील, त्या सर्वाची सध्या चाचणी केली जाते पण यापुढे अशा प्रवाशांना फक्त थर्मल स्कॅनरमधून जावे लागेल. जर कुणाला ताप आहे असे आढळले तरच कोविद चाचणी केली जाईल. थर्मल गनने प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासले जाणार नाही, असे मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. दरम्यान, आरोग्य सचिव श्रीमती निला मोहनन यांनी मात्र अजून याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही, विविध चर्चा सुरू आहे, असे स्पष्ट केले.