शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्वाच्या मुद्द्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना

By admin | Updated: September 6, 2014 01:24 IST

पणजी : नागरिकत्व मिळविण्यासाठी तसेच दीर्घकालीन व्हिसा मिळविण्यासाठी येणाऱ्या अर्जांवर देखरेख ठेवावी व या अर्जांवर लवकर प्रक्रिया करून ते जलदगतीने निकालात निघावेत

पणजी : नागरिकत्व मिळविण्यासाठी तसेच दीर्घकालीन व्हिसा मिळविण्यासाठी येणाऱ्या अर्जांवर देखरेख ठेवावी व या अर्जांवर लवकर प्रक्रिया करून ते जलदगतीने निकालात निघावेत म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. यामुळे नागरिकत्वाच्या विषयाबाबत वादात सापडलेल्या गोमंतकीयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. नागरिकत्वाच्या विषयाबाबतच्या प्रकरणांचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आढावा घेतला. नागरिकत्व व दीर्घकालीन व्हिसासाठी येणारे अनेक अर्ज हे बराच काळ प्रलंबित राहतात, अशा तक्रारी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आल्यानंतर सिंग यांनी या तक्रारींची दखल घेतली. विलंबामुळे, विशेषत: अल्पसंख्याकांमधील लोकांची गैरसोय होते. विविध राज्यांकडेही अर्ज प्रलंबित राहतात. तिथेही लक्ष देऊन राज्य सरकारच्या गृह खात्यांशी व विदेशी नोंदणी विभागाशी चर्चा करावी म्हणून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. विदेश विभागाच्या संयुक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली हा टास्क फोर्स स्थापन झाला असून येत्या दोन आठवड्यांत या फोर्सचे काम सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. दरम्यान, गोव्यात दुहेरी नागरिकत्वाचा विषय ज्वलंत बनलेला आहे. पोर्तुगालमध्ये ज्या गोमंतकीयांनी आपल्या जन्माची नोंदणी केली आहे, त्या सर्वांचे भारतीय नागरिकत्व अडचणीत आले आहे. या समस्येवर उपाय निघण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचा टास्क फोर्स स्थापण्याचा निर्णय हा गोव्याला मदतरूप ठरेल, अशी प्रतिक्रिया गोव्याच्या प्रशासनात व्यक्त होत आहे. (खास प्रतिनिधी)