शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

Election Results Live - पाच राज्यांमधील निकालावर काँग्रेसचा बी प्लान

By admin | Updated: March 11, 2017 08:54 IST

काँग्रेस जरी एक्झिट पोलनंतरही आपल्याच विजयाचा दावा करत असली तरी त्यांनी बी प्लान तयार ठेवला असून आपला बचाव सुरु केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - काँग्रेसने उत्तरप्रदेशसहित पाच राज्यांमधील एक्झिट पोलला नाकारात आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गाधी यांनी एक्झिट पोलच्या आकड्यांवर बोलायचं टाळलं असून उत्तरप्रदेशात समाजवादी आणि आपल्या युतीचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. एक्झिट पोलमध्ये उत्तरप्रदेशात भाजपाची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला जात असल्यावरुन विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर काही बोलू शकत नाही असं सांगितलं. राहुल गांधी बोलले आहेत की, 'एक्झिट पोलची परिस्थिती बिहारसारखी होईल. आमची युती जिंकत आहे. असे एक्झिट पोल आम्ही बिहारमध्येदेखील पाहिले आहेत. यावर उद्या बोलू'.
 
काँग्रेस जरी एक्झिट पोलनंतरही आपल्याच विजयाचा दावा करत असली तरी त्यांनी बी प्लान तयार ठेवला असून आपला बचाव सुरु केला आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने उत्तरप्रदेशात सरकार बनवण्यासाठी सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध असल्याचं कबूल केलं आहे. काँग्रेसने विजय - पराभवावर बोलताना कोणाचाही विजय झाला तरी ख-या अर्थाने हा भारतीय मतदाराचा विजय असेल असं सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
 
सरकार बनवण्याचा प्रयत्न करणार - 
काँग्रेसने गरज पडल्यास समाजवादी - काँग्रेस युती सरकार स्थापन करण्यासाठी बहुजन समाज पक्षाला मदत करेल असे संकेत दिले आहेत. काँग्रेसने मात्र ही काल्पनिक परिस्थिती असून राजकारणात गरज पडल्यास असंही होऊ शकतं असं सांगितलं आहे. त्यावेळी असणा-या परिस्थितीत जे शक्य असेल ते करण्यात येईल असं काँग्रेसने सांगितलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीदेखील जातीय ताकदींना रोखण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. अखिलेश यांनी मायावती यांचं नाव न घेता सांगितलं आहे की, गरज पडल्यास याचा विचार केला जाऊ शकतो.  
 
एक्झिट पोलमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची पिछेहाट होताना दिसल्यावर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी धर्मनिरपेक्ष एकतेचा पत्ता खोलला. जातीय ताकदींना रोखायचं असेल तर धर्मनिरपेक्ष ताकदींना एकत्र येण्याची गरज असल्याचं अखिलेश यादव बोलले आहेत. मायावतीच्या बहुजन समाज पक्षाकडे त्यांचा सरळ इशारा होता. 
 
हे पोल जाहीर होत असतानाच अखिलेश यादव यांनी आम्ही उत्तर प्रदेशात कदापि भाजपाचे सरकार बनू देणार नाही, त्यासाठी प्रसंगी मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीशी समझोता करू, असे बीबीसीला सांगितले आहे. याचाच अर्थ सपाला बहुमत मिळणार नाही, हे जणू त्यांनी मान्यच केल्याचे दिसते.
 
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर व गोवा या पाच राज्यांपैकी केवळ गोव्यात आता भाजपाचे सरकार होते. तिथे तोच पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे एक्झिट पोल व्यक्त करीत आहेत. पंजाबमध्ये अकाली दलाबरोबर भाजपा सत्तेत होती. पण तिथे दोन्ही पक्ष दणकून मार खातील आणि काँग्रेस व आप यांच्यापैकी एकाला बहुमत मिळेल, असे हे पोल सांगतात. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्षाला ११0 ते १६९च्या दरम्यान जागा मिळतील, असे हे पोल म्हणतात. तिथे भाजपाला १५५ ते २१0च्या दरम्यान जागा मिळतील, असे या सर्व्हेवरून दिसते. केवळ एकाच पोलमध्ये तिथे भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त झाली असली तरी अन्य पोलनुसार भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, पण बहुमत मात्र मिळणार नाही, असे दिसते. मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण तो पक्ष तिथे मागे पडेल, असे पोल सांगतात. म्हणजेच आसाम, अरुणाचल प्रदेश यानंतर ईशान्येकडील आणखी एका राज्यात भाजपा शिरकाव करेल.