शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Election Results Live - पाच राज्यांमधील निकालावर काँग्रेसचा बी प्लान

By admin | Updated: March 11, 2017 08:54 IST

काँग्रेस जरी एक्झिट पोलनंतरही आपल्याच विजयाचा दावा करत असली तरी त्यांनी बी प्लान तयार ठेवला असून आपला बचाव सुरु केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - काँग्रेसने उत्तरप्रदेशसहित पाच राज्यांमधील एक्झिट पोलला नाकारात आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गाधी यांनी एक्झिट पोलच्या आकड्यांवर बोलायचं टाळलं असून उत्तरप्रदेशात समाजवादी आणि आपल्या युतीचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. एक्झिट पोलमध्ये उत्तरप्रदेशात भाजपाची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला जात असल्यावरुन विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर काही बोलू शकत नाही असं सांगितलं. राहुल गांधी बोलले आहेत की, 'एक्झिट पोलची परिस्थिती बिहारसारखी होईल. आमची युती जिंकत आहे. असे एक्झिट पोल आम्ही बिहारमध्येदेखील पाहिले आहेत. यावर उद्या बोलू'.
 
काँग्रेस जरी एक्झिट पोलनंतरही आपल्याच विजयाचा दावा करत असली तरी त्यांनी बी प्लान तयार ठेवला असून आपला बचाव सुरु केला आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने उत्तरप्रदेशात सरकार बनवण्यासाठी सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध असल्याचं कबूल केलं आहे. काँग्रेसने विजय - पराभवावर बोलताना कोणाचाही विजय झाला तरी ख-या अर्थाने हा भारतीय मतदाराचा विजय असेल असं सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
 
सरकार बनवण्याचा प्रयत्न करणार - 
काँग्रेसने गरज पडल्यास समाजवादी - काँग्रेस युती सरकार स्थापन करण्यासाठी बहुजन समाज पक्षाला मदत करेल असे संकेत दिले आहेत. काँग्रेसने मात्र ही काल्पनिक परिस्थिती असून राजकारणात गरज पडल्यास असंही होऊ शकतं असं सांगितलं आहे. त्यावेळी असणा-या परिस्थितीत जे शक्य असेल ते करण्यात येईल असं काँग्रेसने सांगितलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीदेखील जातीय ताकदींना रोखण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. अखिलेश यांनी मायावती यांचं नाव न घेता सांगितलं आहे की, गरज पडल्यास याचा विचार केला जाऊ शकतो.  
 
एक्झिट पोलमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची पिछेहाट होताना दिसल्यावर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी धर्मनिरपेक्ष एकतेचा पत्ता खोलला. जातीय ताकदींना रोखायचं असेल तर धर्मनिरपेक्ष ताकदींना एकत्र येण्याची गरज असल्याचं अखिलेश यादव बोलले आहेत. मायावतीच्या बहुजन समाज पक्षाकडे त्यांचा सरळ इशारा होता. 
 
हे पोल जाहीर होत असतानाच अखिलेश यादव यांनी आम्ही उत्तर प्रदेशात कदापि भाजपाचे सरकार बनू देणार नाही, त्यासाठी प्रसंगी मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीशी समझोता करू, असे बीबीसीला सांगितले आहे. याचाच अर्थ सपाला बहुमत मिळणार नाही, हे जणू त्यांनी मान्यच केल्याचे दिसते.
 
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर व गोवा या पाच राज्यांपैकी केवळ गोव्यात आता भाजपाचे सरकार होते. तिथे तोच पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे एक्झिट पोल व्यक्त करीत आहेत. पंजाबमध्ये अकाली दलाबरोबर भाजपा सत्तेत होती. पण तिथे दोन्ही पक्ष दणकून मार खातील आणि काँग्रेस व आप यांच्यापैकी एकाला बहुमत मिळेल, असे हे पोल सांगतात. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्षाला ११0 ते १६९च्या दरम्यान जागा मिळतील, असे हे पोल म्हणतात. तिथे भाजपाला १५५ ते २१0च्या दरम्यान जागा मिळतील, असे या सर्व्हेवरून दिसते. केवळ एकाच पोलमध्ये तिथे भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त झाली असली तरी अन्य पोलनुसार भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, पण बहुमत मात्र मिळणार नाही, असे दिसते. मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण तो पक्ष तिथे मागे पडेल, असे पोल सांगतात. म्हणजेच आसाम, अरुणाचल प्रदेश यानंतर ईशान्येकडील आणखी एका राज्यात भाजपा शिरकाव करेल.