शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सदोष शिक्षणामुळे युवक तणावग्रस्त

By admin | Updated: September 27, 2015 02:54 IST

पणजी : मुलांच्या मनात संस्कारांचे रोपण घरात होते. मात्र, आयुष्यभराची शिदोरी म्हणून शिक्षकच त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत असतात.

पणजी : मुलांच्या मनात संस्कारांचे रोपण घरात होते. मात्र, आयुष्यभराची शिदोरी म्हणून शिक्षकच त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत असतात. शिक्षण व्यवस्थेतील दोषांमुळे नवीन पिढी कायम तणावग्रस्त राहत आहे. नोकरी करण्यासाठी आणखी पर्याय नसल्याने केवळ शेवटचा पर्याय म्हणून नाईलाजास्तव कुणीच शिक्षकी पेशा स्वीकारू नये, असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी बीजभाषणातून दिला. दोनापावला येथील डॉ. शामा प्रसाद मुखर्जी सभागृहात ‘एड्युव्हिजन इंडिया २0२0’ या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. ‘पुढील पिढीसाठी दर्जेदार व सर्वंकष शिक्षण’ हा या परिषदेचा विषय आहे. या वेळी सभापती राजेंद्र आर्लेकर, आयोजन समितीचे अध्यक्ष दीपक खैतान, विजय शेट्टी, डॉ. माधवी कामत इत्यादी सभासद उपस्थित होते. गुरुजी म्हणाले, साधारण २५ वर्षांपूर्वी देशात ७0 टक्के कैदी अशिक्षित, तर ३0 टक्के शिक्षित होते. मात्र, परिस्थिती उलट झाली असून सध्या ७३ टक्के कैदी हे शिक्षित आहेत, तर २३ टक्के कैदी अशिक्षित असल्याचा अहवाल आहे. हा शिक्षण व्यवस्थेचा परिणाम म्हणावा लागेल. भारत हा सर्वाधिक युवा असलेला देश आहे. देशाकडे ६0 ते ७0 टक्केयुवाशक्ती असून येथे केवळ २-३ टक्के कौशल्यपूर्ण शिक्षण प्राप्त केलेले युवा आहेत. गोवा हे हुशारी, शिक्षण, सुसंवाद आणि विविधता यासाठी ओळखले जाते. शिक्षणाची वेगळी ओळख या राज्यातून झाल्यास इतरांसाठी आदर्श ठरेल, असे त्यांनी सांगितले. राजेंद्र आर्लेकर म्हणाले, राज्याचे शैक्षणिक धोरण आणि पद्धती पाहता येणाऱ्या पिढीला दर्जेदार आणि सर्वंकष शिक्षण देण्याची गरज आहे. सामाजिक मानसिकता पाहता दर्जेदार शिक्षण म्हणजे केवळ इंग्रजी भाषेवर भर देणे उचित ठरणार नाही. भाषेबरोबरच, कौशल्यपूर्ण अभ्यास, व्यक्तिमत्त्व विकास यावरही भर देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समप्रमाणात शिक्षण मिळेल याची व्यवस्था करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात सुरुवातीला ज्ञानविकास हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी धनगर लोकनृत्य आणि समई नृत्य सादर केले. सायंकाळी ‘आनंदोत्सव २0१५’ हा कार्यक्रम गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली झाला. दरम्यान, दि. २७ रोजी गोवा विद्यापीठाच्या सभागृहात शैक्षणिक विषयावर विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. यात सकाळी ९.३0 वाजता ‘बजेट स्कूल आणि चॅलेंज’ या विषयावर शशीकुमार बी. मार्गदर्शन करतील. ‘शिक्षणात पालकांची भूमिका’ या विषयावर मुरली कोठेश्वर हे व्याख्यान देणार आहेत. ‘द ग्राउंड रिअलिटी’ विषयावर डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे संवाद साधतील. ‘मेंटल हेल्थ इन स्कूल’ या विषयावर डॉ. हरीश शेट्टी प्रकाश टाकतील. तर ‘होलिस्टीक आणि स्कील बेस एज्युकेशन’ या विषयावर तेरेजा अल्मेदा व्याख्यान देणार आहेत. त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यक्रम होईल. (प्रतिनिधी)