शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

प्रभाग फेररचनेत गोलमाल : सरदेसाई

By admin | Updated: July 15, 2015 01:46 IST

मडगाव : नगरपालिका प्रभागांची फेररचना करताना मडगावात मोठ्या प्रमाणावर गोलमाल झाल्याचा आरोप फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे

मडगाव : नगरपालिका प्रभागांची फेररचना करताना मडगावात मोठ्या प्रमाणावर गोलमाल झाल्याचा आरोप फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. याला सत्ताधारी भाजप नेत्यांचा आशीर्वाद आहे. या फेररचनेला हिरवा कंदील मिळावा, यासाठी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या निवासस्थानी मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केला. काही भाजप पुरस्कृत उमेदवारांना फायदा व्हावा, यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्याला हवी तशी प्रभागाची फेररचना केली जात असून या प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रभागांची फेररचना आणि राखीवता निवडणूक आयोगाकडून निश्चित केली जावी, अशी मागणी यापूर्वी आपण याचसाठी केली होती, असे ते म्हणाले. दरम्यान, फक्त मडगावातच नव्हे, तर दक्षिण गोव्यातील इतरही नगरपालिकांत भाजप नेत्यांनी फेररचना व राखीवतेत हस्तक्षेप केल्याचा आरोप होत आहे. कुंकळ्ळी पालिकेत सध्या जे दहा प्रभाग आहेत, ते बारा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा स्थितीत देमानी भागातील आपला प्रभाव कमी होऊ नये, यासाठी आमदार राजन नाईक यांनी या निवडणुकीत तेरा प्रभाग करण्याची शिफारस केली आहे. काणकोणातही प्रभाग रचनेत मंत्री रमेश तवडकर यांच्यासह माजी आमदार विजय पै खोत व इजिदोर फर्नांडिस यांचा हस्तक्षेप चालू असल्याचा आरोप आहे. केपे, सावर्डे व कुडचडे या तीन पालिकांतील स्थिती बरी आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)