शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निवडणूक समिती बरखास्त करा

By admin | Updated: April 27, 2016 02:01 IST

पणजी : काँग्रेसने नेमलेली प्रदेश निवडणूक समिती अगोदर बरखास्तच करा, अशी जोरदार मागणी काँग्रेसमधील युवा वर्गाने

पणजी : काँग्रेसने नेमलेली प्रदेश निवडणूक समिती अगोदर बरखास्तच करा, अशी जोरदार मागणी काँग्रेसमधील युवा वर्गाने चालविली आहे. काँग्रेसचे सचिव दुर्गादास कामत तसेच तन्वीर खतिब, फिरोज खान, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस ऐश्वर्या साळगावकर आदींनी मंगळवारी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली व निवडणूक समिती बरखास्त करा व पक्षाची समन्वय समितीही बदला, अशी मागणी केली. कामत म्हणाले की, आम्ही काँग्रेस पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. मात्र, जुन्या आणि पराभूत तसेच विविध घोटाळ्यांचे आरोप असलेल्या नेत्यांना प्रदेश निवडणूक समितीवर स्थान देऊ नका. तसेच अशा नेत्यांना निवडणुकीवेळी उमेदवारी देऊ नका, त्याऐवजी युवकांना पुढे आणा, अशी आमची मागणी आहे. कामत म्हणाले की, लुईझिन फालेरो यांनी आपण जुन्या नेत्यांचा मेंटर नव्हे, असे विधान केले आहे. आम्ही त्या विधानाचे स्वागत करतो. आता फालेरो यांनीच निवडणूक समिती बरखास्त व्हावी म्हणून पुढाकार घ्यावा. आमच्या भूमिकेशी ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही सहमती दाखवली आहे. काँग्रेसमध्ये युवकांना प्रोत्साहन द्यावे, युवकांना पुढे आणावे या आमच्या मागणीला त्यांचा पाठिंबा आहे. काँग्रेसमध्ये महिलांनाही वाव द्या, महिलांनाही निवडणुकीवेळी अधिकाधिक उमेदवारी दिली जावी, अशी मागणी ऐश्वर्या साळगावकर यांनी केली. आपण अल्पसंख्याक विभागाचे व म्हापसा गटाचे पदाधिकारी असताना उरफान मुल्ला हे आपण कुणीच नव्हे, असे म्हणत आहेत. मुल्ला यांना आपण कायदेशीर नोटीस पाठवीन, असा इशारा फिरोज खान यांनी दिला. तन्वीर खतिब यांनी या वेळी सांगितले की, आपली काँग्रेसमधून यापूर्वी कधीच कुणी हकालपट्टी केली नव्हती. काणकोणमध्ये काही वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी जो मदत निधी जमविण्यात आला होता, त्यात युवक काँग्रेसच्या त्या वेळच्या काही नेत्यांनी घोटाळा केला होता. गरीब पूरग्रस्तांसाठी असलेले पैसे लाटले होते आणि आपण तो घोटाळा उघड केला होता म्हणून आपले पद काढून घेण्यात आले होते. (खास प्रतिनिधी)