शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वीज, पाणी बिले महागल्याने असंतोष

By admin | Updated: April 11, 2015 02:18 IST

पणजी : एका बाजूने लोकांना प्रचंड दराने विजेची वाढीव बिले येत आहेत व दुसऱ्या बाजूने सरकारने पाण्याचे दर दुप्पट केले आहेत.

पणजी : एका बाजूने लोकांना प्रचंड दराने विजेची वाढीव बिले येत आहेत व दुसऱ्या बाजूने सरकारने पाण्याचे दर दुप्पट केले आहेत. या दरवाढीविरुद्ध सामान्य कुटुंबांमधून तीव्र निषेधाची भावना व्यक्त होत आहे. घरगुती वापराच्या पाण्यासह छोटी हॉटेल्स आणि छोट्या रेस्टॉरंटसाठीही सरकारने पाण्याच्या दरात वाढ केली. दि. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात लोकांना पाण्याची वाढीव बिले येणार आहेत. १५ घनमीटरपर्यंत प्रति घनमीटर अडीच रुपये दर लागू करण्यात आला आहे. १५ ते २५ घनमीटरपर्यंत पाण्याच्या वापरासाठी ५ रुपये, २५ ते ५० घनमीटरपर्यंत पाण्यासाठी १० रुपये आणि ५० घनमीटरपेक्षा जास्त पाण्याच्या वापरावर प्रति घनमीटर १५ रुपये असा दर लागू झाला आहे. ही वाढ दुप्पट असल्याने लोकांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हॉटेल्सना पहिल्या ८० घनमीटर पाण्याच्या वापरासाठी प्रति घनमीटर २० रुपये, तर ८० घनमीटरपेक्षा जास्त पाण्याच्या वापरासाठी प्रति घनमीटर २५ रुपये पाणीपट्टी करण्यात आली आहे. वाट्टेल तो दर लावून लोकांना सध्या वीज बिले पाठवली जात आहेत. जे कुटुंब दरमहा केवळ तीनशे रुपयांचे वीज बिल भरत होते, त्या कुटुंबाला आता बाराशे रुपयांचे वीज बिल येते. काहीजणांना तर सात-आठ हजार रुपयांची वीज बिले आली आहेत. लोक शासकीय यंत्रणेच्या नावे बोटे मोडत आहेत. तशात आता पाण्याचे दर दुप्पट करण्यात आले आहेत. यापुढे सरकार लोकांच्या नाका-तोंडात जाणाऱ्या हवेवरही कर लावील, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी व्यक्त केली. पेट्रोलचा दर अगोदर कमी करून मग आता पूर्णपणे वाढवला गेला आहे. ही लोकांची फसवणूक आहे. कुठचीच गोष्ट विद्यमान सरकारने करमुक्त ठेवलेली नाही. सामान्य माणसाला जगणेच अशक्य केले आहे, असे डिमेलो म्हणाले. वेरे-बेती येथील राजेश दाभोळकर हे तरुण म्हणाले, की सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला जगूच देत नाही. गरिबांच्या कल्याणाच्या गोष्टी बोलणाऱ्या सरकारने पाणी व वीज खूपच महाग करून ठेवली आहे. पर्वरीसह अनेक भागांत लोकांना नियमितपणे पाणीही मिळत नाही व ग्रामीण गोव्यात विजेचा खेळखंडोबा चालू असतो. ग्रामीण भागातील लोक वाढीव पाणी बिले भरू शकणार नाहीत. केंद्र सरकारने तर औषधेही अत्यंत महाग करून ठेवली आहेत. (खास प्रतिनिधी)