शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वीज, पाणी बिले महागल्याने असंतोष

By admin | Updated: April 11, 2015 02:18 IST

पणजी : एका बाजूने लोकांना प्रचंड दराने विजेची वाढीव बिले येत आहेत व दुसऱ्या बाजूने सरकारने पाण्याचे दर दुप्पट केले आहेत.

पणजी : एका बाजूने लोकांना प्रचंड दराने विजेची वाढीव बिले येत आहेत व दुसऱ्या बाजूने सरकारने पाण्याचे दर दुप्पट केले आहेत. या दरवाढीविरुद्ध सामान्य कुटुंबांमधून तीव्र निषेधाची भावना व्यक्त होत आहे. घरगुती वापराच्या पाण्यासह छोटी हॉटेल्स आणि छोट्या रेस्टॉरंटसाठीही सरकारने पाण्याच्या दरात वाढ केली. दि. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात लोकांना पाण्याची वाढीव बिले येणार आहेत. १५ घनमीटरपर्यंत प्रति घनमीटर अडीच रुपये दर लागू करण्यात आला आहे. १५ ते २५ घनमीटरपर्यंत पाण्याच्या वापरासाठी ५ रुपये, २५ ते ५० घनमीटरपर्यंत पाण्यासाठी १० रुपये आणि ५० घनमीटरपेक्षा जास्त पाण्याच्या वापरावर प्रति घनमीटर १५ रुपये असा दर लागू झाला आहे. ही वाढ दुप्पट असल्याने लोकांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हॉटेल्सना पहिल्या ८० घनमीटर पाण्याच्या वापरासाठी प्रति घनमीटर २० रुपये, तर ८० घनमीटरपेक्षा जास्त पाण्याच्या वापरासाठी प्रति घनमीटर २५ रुपये पाणीपट्टी करण्यात आली आहे. वाट्टेल तो दर लावून लोकांना सध्या वीज बिले पाठवली जात आहेत. जे कुटुंब दरमहा केवळ तीनशे रुपयांचे वीज बिल भरत होते, त्या कुटुंबाला आता बाराशे रुपयांचे वीज बिल येते. काहीजणांना तर सात-आठ हजार रुपयांची वीज बिले आली आहेत. लोक शासकीय यंत्रणेच्या नावे बोटे मोडत आहेत. तशात आता पाण्याचे दर दुप्पट करण्यात आले आहेत. यापुढे सरकार लोकांच्या नाका-तोंडात जाणाऱ्या हवेवरही कर लावील, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी व्यक्त केली. पेट्रोलचा दर अगोदर कमी करून मग आता पूर्णपणे वाढवला गेला आहे. ही लोकांची फसवणूक आहे. कुठचीच गोष्ट विद्यमान सरकारने करमुक्त ठेवलेली नाही. सामान्य माणसाला जगणेच अशक्य केले आहे, असे डिमेलो म्हणाले. वेरे-बेती येथील राजेश दाभोळकर हे तरुण म्हणाले, की सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला जगूच देत नाही. गरिबांच्या कल्याणाच्या गोष्टी बोलणाऱ्या सरकारने पाणी व वीज खूपच महाग करून ठेवली आहे. पर्वरीसह अनेक भागांत लोकांना नियमितपणे पाणीही मिळत नाही व ग्रामीण गोव्यात विजेचा खेळखंडोबा चालू असतो. ग्रामीण भागातील लोक वाढीव पाणी बिले भरू शकणार नाहीत. केंद्र सरकारने तर औषधेही अत्यंत महाग करून ठेवली आहेत. (खास प्रतिनिधी)