शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

बायणा किनाऱ्याच्या विकासाचा निर्धार

By admin | Updated: April 19, 2015 01:02 IST

वास्को : कित्येक वर्षे वास्को शहर विकासापासून दूर राहिले आहे़ वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या अथक परिश्रमाने सुमारे नऊ कोटी रुपये

वास्को : कित्येक वर्षे वास्को शहर विकासापासून दूर राहिले आहे़ वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या अथक परिश्रमाने सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून बायणा समुद्रकिनाऱ्याचा विकास करणारा प्रकल्प आलेला आहे. त्यास मोजक्याच लोकांकडून अनेक कारणे पुढे करून विरोध होत आहे़ विरोधकांच्या या प्रयत्नांना समर्थपणे लढा देऊन त्यांचा बीमोड करण्याचा निर्धार शनिवारी (दि.१८) वास्कोवासियांनी केला़ संध्याकाळी बायणा रवींद्र भवन जवळ वास्कोतील काही नागरिकांनी बायणा समुद्रकिनारा सुशोभीकरण प्रकल्पास पाठिंब्यासाठी येथील समाज कार्यकर्ते जयंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभेचे आयोजन केले होते़ त्या वेळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर या सभेतील अनेक वक्त्यांनी प्रकल्पास पाठिंबा दिला. तसेच वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून या प्रकल्पाविरुध्द लढा देणाऱ्यांना समर्थपणे तोंड देण्याचा निर्धार केला़ वास्को शहर हे जरी विमानतळ, मुरगाव बंदर व रेल्वेमुळे प्रसिध्द असले तरी विकासाच्या दृष्टीने मागासलेले आहे़ शहरात जरी विमानतळ आणि रेल्वे टर्मिनल असला तरी या मार्गाने येणारे प्रवासी पर्यटनाच्या नावाने या शहराची प्रसिध्दी नसल्याने थेट राजधानी किंवा इतर ठिकाणच्या पर्यटनस्थळी जातात़ शिवाय हे शहर एका टोकाला असल्याने या शहरातील सर्व व्यवहार या शहरापुरते मर्यादित असतात़ तसेच या शहरात पर्यटनस्थळांचा अभाव असल्यामुळे या शहरात पर्यटकही फि रकत नाही़ या सर्व कारणांमुळे हे शहर विकासापासून अलिप्त राहिलेले आहे़ या शहरात नयनरम्य असा समुद्रकिनारा असूनही या किनाऱ्याची पर्यटकांना ओळखही नाही़ निदान या समुद्रकिनाऱ्याचा विकास करून या शहराचे नाव पर्यटनस्थळावर आणण्यासाठी वीजमंत्र्यांनी कंबर कसली आहे. सुमारे ९ कोटी रुपये खर्चून सुमारे ५ किलोमीटरची किनारपट्टी असलेल्या समुद्रकिनाऱ्याचा विकास करणारा हा प्रकल्प हाती घेतला आहे़ या समुद्रकिनाऱ्यावर अगदी वाळूत आणि समुद्र भरती रेषेच्या आत काही परप्रांतीयांनी बेकायदेशीरपणे आपल्या झोपड्यावजा घरे उभारलेली आहेत़ या बेकायदेशीर घरांना आरोग्याच्या दृष्टीनेही कोणत्याच सुविधा नसल्याने नैसर्गिक विधी या किनाऱ्यावरच करून किनारा दुर्गंधीमय करण्यात येतो़ अशा परिस्थितीत या किनाऱ्याचा विकास होऊच शकत नसल्याने ही बेकायदेशीर घरे हटविणे अत्यंत गरजेचे आहे़; पण या घरमालकांकडून किनारा सुशोभीकरणास विरोध होत आहे़ बेकायदेशीर झोपडपट्टीवासियांकडून होणाऱ्या विरोधामुळे शहराच्या विकासाला खिळ बसत आहे़ त्यांचा हा विरोध मोडून काढण्याचा निर्धार सभेत करण्यात आला. संतोष खोर्जुवेकर यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनीच आभार मानले़ (प्रतिनिधी)