शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

बायणा किनाऱ्याच्या विकासाचा निर्धार

By admin | Updated: April 19, 2015 01:02 IST

वास्को : कित्येक वर्षे वास्को शहर विकासापासून दूर राहिले आहे़ वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या अथक परिश्रमाने सुमारे नऊ कोटी रुपये

वास्को : कित्येक वर्षे वास्को शहर विकासापासून दूर राहिले आहे़ वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या अथक परिश्रमाने सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून बायणा समुद्रकिनाऱ्याचा विकास करणारा प्रकल्प आलेला आहे. त्यास मोजक्याच लोकांकडून अनेक कारणे पुढे करून विरोध होत आहे़ विरोधकांच्या या प्रयत्नांना समर्थपणे लढा देऊन त्यांचा बीमोड करण्याचा निर्धार शनिवारी (दि.१८) वास्कोवासियांनी केला़ संध्याकाळी बायणा रवींद्र भवन जवळ वास्कोतील काही नागरिकांनी बायणा समुद्रकिनारा सुशोभीकरण प्रकल्पास पाठिंब्यासाठी येथील समाज कार्यकर्ते जयंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभेचे आयोजन केले होते़ त्या वेळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर या सभेतील अनेक वक्त्यांनी प्रकल्पास पाठिंबा दिला. तसेच वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून या प्रकल्पाविरुध्द लढा देणाऱ्यांना समर्थपणे तोंड देण्याचा निर्धार केला़ वास्को शहर हे जरी विमानतळ, मुरगाव बंदर व रेल्वेमुळे प्रसिध्द असले तरी विकासाच्या दृष्टीने मागासलेले आहे़ शहरात जरी विमानतळ आणि रेल्वे टर्मिनल असला तरी या मार्गाने येणारे प्रवासी पर्यटनाच्या नावाने या शहराची प्रसिध्दी नसल्याने थेट राजधानी किंवा इतर ठिकाणच्या पर्यटनस्थळी जातात़ शिवाय हे शहर एका टोकाला असल्याने या शहरातील सर्व व्यवहार या शहरापुरते मर्यादित असतात़ तसेच या शहरात पर्यटनस्थळांचा अभाव असल्यामुळे या शहरात पर्यटकही फि रकत नाही़ या सर्व कारणांमुळे हे शहर विकासापासून अलिप्त राहिलेले आहे़ या शहरात नयनरम्य असा समुद्रकिनारा असूनही या किनाऱ्याची पर्यटकांना ओळखही नाही़ निदान या समुद्रकिनाऱ्याचा विकास करून या शहराचे नाव पर्यटनस्थळावर आणण्यासाठी वीजमंत्र्यांनी कंबर कसली आहे. सुमारे ९ कोटी रुपये खर्चून सुमारे ५ किलोमीटरची किनारपट्टी असलेल्या समुद्रकिनाऱ्याचा विकास करणारा हा प्रकल्प हाती घेतला आहे़ या समुद्रकिनाऱ्यावर अगदी वाळूत आणि समुद्र भरती रेषेच्या आत काही परप्रांतीयांनी बेकायदेशीरपणे आपल्या झोपड्यावजा घरे उभारलेली आहेत़ या बेकायदेशीर घरांना आरोग्याच्या दृष्टीनेही कोणत्याच सुविधा नसल्याने नैसर्गिक विधी या किनाऱ्यावरच करून किनारा दुर्गंधीमय करण्यात येतो़ अशा परिस्थितीत या किनाऱ्याचा विकास होऊच शकत नसल्याने ही बेकायदेशीर घरे हटविणे अत्यंत गरजेचे आहे़; पण या घरमालकांकडून किनारा सुशोभीकरणास विरोध होत आहे़ बेकायदेशीर झोपडपट्टीवासियांकडून होणाऱ्या विरोधामुळे शहराच्या विकासाला खिळ बसत आहे़ त्यांचा हा विरोध मोडून काढण्याचा निर्धार सभेत करण्यात आला. संतोष खोर्जुवेकर यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनीच आभार मानले़ (प्रतिनिधी)