शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

आयएएस अधिकाऱ्यांवर उपमुख्यमंत्र्यांची तोफ

By admin | Updated: April 26, 2016 01:47 IST

पणजी : उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी गोव्यात बदली होऊन येणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठविताना

पणजी : उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी गोव्यात बदली होऊन येणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठविताना हे अधिकारी गोव्यात राहायला बघत नाहीत. तसेच ते वरचेवर दिल्लीवाऱ्या करीत असल्याने प्रशासनावर परिणाम होतो, असा आरोप केला आहे. या अधिकाऱ्यांना गोव्यात बदली हवी असते; परंतु एकदा ताबा घेतला की दिल्लीवारीसाठी संधीची ते वाटच पाहात असतात, असे डिसोझा वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. सचिव म्हणून काम करणारे आयएएस अधिकारीच जेव्हा उपलब्ध नसतात तेव्हा प्रशासनावर त्याचा परिणाम होतो, असे ते म्हणाले. राज्य सरकारची काम करण्याची पद्धत बदलली पाहिजे. व्यवस्थेत काही दुरुस्त्या घडवून आणण्याची गरज आहे. आम्ही नेहमीच व्यवस्थेबद्दल तक्रार करतो. ती सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. दरम्यान, खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रश्नावर विचारले असता, मुख्यमंत्र्यांवर अजून नाराजी असल्याचा त्यांनी इन्कार केला. या विषयावरून आपण पक्ष किंवा सरकारविरोधात कधीच बोललेलो नाही. केवळ व्यवस्थेतील ज्या त्रुटी आहेत, त्या दूर कराव्यात असे भाष्य केल्याचे डिसोझा म्हणाले. मला वैयक्तिक मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ आपण पक्षाविरोधी बोलतोय, असा होत नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)