शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

गोव्यात हॉटेल्स, गेस्ट हाऊसना शिथिलता; मात्र पर्यटकांसाठी शिष्टाचार प्रक्रिया नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:53 IST

सर्व प्रकारची तारांकित हॉटेल्स बंदच; व्यावसायिकांना भविष्याची चिंता 

पणजी : गोव्यात पर्यटकांसाठी अजून सरकारची शिष्टाचार प्रक्रिया निश्चित झालेली नसल्याने वास्तव्यासाठीची हॉटेल्स, गेस्ट हाऊसही उघडू शकलेली नाहीत. पर्यटक नाहीत त्यामुळे हॉटेले उघडून ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी स्थिती होऊ नये याकरिता व्यावसायिक हॉटेल उघडण्याच्या फंदात पडलेले नाहीत. हॉटेल व्यावसायिकांचे हे वर्ष वाया गेल्यातच जमा आहे. सप्टेंबरनंतर पाहू, अशी भूमिका काही व्यावसायिकांनी घेतली आहे. राज्यात पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या ‘टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा’ या संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की, ‘सरकारने हॉटेलमालकांना फॉर्म भरुन देण्यास सांगितले आहे. किती कर्मचारी असतील वगैरे माहिती मागितली आहे. मुख्य म्हणजे जे पर्यटक गोव्यात येतील त्यांच्यासाठी शिष्टाचार प्रक्रिया (एसओपी) निश्चित होणे आवश्यक आहे. पुढील सात ते आठ दिवसात हे काम होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.’संपूर्ण हॉटेल क्वारंटाइन का करावे? शहा म्हणाले की, ‘उद्या एखाद्या पर्यटकाला ‘कोरोना’ची लागण झाली तर संपूर्ण हॉटेल क्वारंटाइन केले जाऊ नये. एक खोली क्वारंटाइन असावी. नपेक्षा हॉटेल उघडले आणि अशी समस्या उद्भवली तर सर्व मुसळ केरात, अशी स्थिती होईल. सरकारने काही सोपस्कार सुटसुटीत करायला हवेत, हेही तेवढेच खरे’हे वर्ष वाया गेलेच : हॉटेलमालक अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष तथा शहरातील ‘मनोशांती’ हॉटेलचे मालक गौरीश धोंड म्हणाले की, ‘हॉटेल्स उघडली तरी पर्यटक नसल्याने सर्व खोल्या रिकाम्याच राहतील. हॉटेल उघडल्यानंतर आम्हाला रिसेप्शनीस्ट, वेटर, सुरक्षा रक्षक, साफसफाईसाठी कामगार ठेवावे लागतील. उत्पन्न काही नाही आणि उलट कामगारांवर खर्च अशी स्थिती होईल. धोंड म्हणाले की, ‘नाकापेक्षा मोती जड होऊ नये. हॉटेल उघडले तर ५ लाख रुपये खर्च आणि बंद ठेवले तर १ लाख रुपये खर्च अशी स्थिती असल्याने माझ्यासारखे व्यावसायिक हॉटेल उघडण्याच्या फंदात पडलेले नाहीत.’