शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

काँग्रेसतर्फे आंदोलनाचा नारा

By admin | Updated: June 28, 2014 01:50 IST

पणजी : काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक दिग्विजय सिंग यांनी गोव्यातील मरणासन्न विरोधी काँग्रेस पक्षात प्राणवायू फुंकण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेवटी जाग येऊन काँग्रेसने राज्यात

पणजी : काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक दिग्विजय सिंग यांनी गोव्यातील मरणासन्न विरोधी काँग्रेस पक्षात प्राणवायू फुंकण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेवटी जाग येऊन काँग्रेसने राज्यात आंदोलनाच्या दृष्टीने आखणी केली आहे. ७ रोजी रेल्वे स्थानकांवर, तर २२ रोजी काँग्रेसतर्फे विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीची बैठक शुक्रवारी म्हापसा येथे पार पडली. त्या बैठकीवेळी दिग्विजय सिंग यांनी गोव्यातील काँग्रेसला मार्र्गदर्शन करत पक्ष संघटनेत प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने राज्य सरकारच्या गैरकारभाराविरुद्ध लढावे, अशी हाक त्यांनी उपस्थित काँग्रेसजनांना दिली. काँग्रेसने आंदोलन करणे निश्चित केले आहे. रेल्वे भाड्यात केंद्र सरकारने केलेल्या मोठ्या दरवाढीच्या निषेधार्थ येत्या ७ जुलै रोजी काँग्रेस पक्षाकडून राज्यातील सर्व सहा रेल्वे स्थानकांवर मोर्चाचे आयोजन केले आहे. २२ जुलै रोजी विधानसभेवर मोर्चा नेऊन राज्य सरकारच्या गैरकारभाराचा निषेध केला जाणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ७ रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने त्या दिवशी राज्यातील थिवी, पेडणे, वास्को, करमळी, सावर्डे आणि मडगाव अशा सहा रेल्वे स्थानकांवर गट काँग्रेस समित्या मोर्चे नेतील व रेल्वे तिकीट दरवाढ मागे घेतली जावी म्हणून आंदोलन करतील, असे फर्नांडिस यांनी सांगितले. २२ जुलै रोजी विधानसभा अधिवेशनास आरंभ होत आहे. त्या दिवशी पर्रीकर सरकारवर आरोपपत्र सादर करण्यासाठी मोर्चा नेला जाणार आहे. स्वत: दिग्विजय सिंगही या मोर्चात भाग घेणार आहेत, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. सिंग यांच्यासह फर्नांडिस, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, खासदार शांताराम नाईक, अ‍ॅड. रमाकांत खलप आदींनी प्रदेश काँग्रेसच्या बैठकीवेळी मनोगते व्यक्त केली. आमदारांना सक्रिय करण्यास येईन काँग्रेसचे आमदार सरकारविरुद्ध संघर्ष करत नाहीत, असा मुद्दा काहीजणांनी बैठकीत मांडला. विधानसभा अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे २१ जुलै रोजी आपण गोव्यात येईन. आपण आमदारांची बैठक घेईन व आमदारांना सक्रिय करीन, असे दिग्विजय सिंग यांनी सांगितले. तसेच यापुढे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकांना प्रदेशाध्यक्ष फर्नांडिसही उपस्थित राहतील, असे ते म्हणाले. महत्त्वाची पदे देऊ नका लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबतही बैठकीत चर्चा झाली. जे कुणी काँग्रेस पक्ष सोडून जातात, त्यांना पुन्हा पक्षात आल्यानंतर महत्त्वाचे पद दिले जाऊ नये, असा मुद्दा एका पदाधिकाऱ्याने मांडला. रवी नाईक हे यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. तिथे ते उपमुख्यमंत्री बनले. ते पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले गेले हे चुकीचे होते, असे उदाहरण या पदाधिकाऱ्याने नमूद केले. (खास प्रतिनिधी)