शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

राज्यात काँग्रेस बळकट होणे अशक्य

By admin | Updated: May 20, 2014 01:39 IST

पणजी : काँग्रेसचे काही आमदार हे नेहमीच बेभरवशाचे आणि चंचल मनस्थितीचे राहिल्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही काही आमदारांबाबत चीड आहे.

पणजी : काँग्रेसचे काही आमदार हे नेहमीच बेभरवशाचे आणि चंचल मनस्थितीचे राहिल्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही काही आमदारांबाबत चीड आहे. गोव्यातील काँग्रेसला त्यांनीही गंभीर घेणे आता सोडून दिले आहे. बेभरवशाच्या आमदारांमुळेच काँग्रेस गोव्यात नजीकच्या काळात तरी बळकट होणे हे जवळजवळ अशक्य बनले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यातही काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने आणि सासष्टीसह अन्य सर्व भागांमध्ये भाजपने बर्‍यापैकी मते मिळविल्याने काँग्रेस पक्ष संघटनेच्या अस्तित्वाबाबत आता पक्षात गंभीरपणे विचार होऊ लागला आहे. जॉन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील नवी प्रदेश काँग्रेस समिती गोव्यात आता काँग्रेस पक्ष कसा बळकट करायचा यावर विचार करत आहे. गेली दोन वर्षे पर्रीकर सरकार अधिकारावर आहे. या सरकारच्या कारभारातील दोष अनेकदा जनतेसमोर मांडूनदेखील लोकांनी मोठ्या प्रमाणात भाजपला मते देऊन पर्रीकर सरकारवर विश्वास दाखविल्याने काँग्रेस पक्ष संघटनाही हताश व असाहाय्य झाली आहे. काँग्रेसचे काही आमदार गट समित्या स्थापन करत नाहीत, आपल्या मतदारसंघात पक्षाचे मेळावेही घेत नाहीत आणि प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकांनाही उपस्थित राहत नाहीत. फक्त तिकीट मिळविण्यापुरताच काही आमदारांचा काँग्रेसशी संपर्क असतो. काही आमदार तर कधी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या तर कधी भाजप नेत्यांच्या कायम संपर्कात असतात, काँग्रेसपेक्षा त्यांची निष्ठा इतरत्रच अधिक असते. अशा प्रकारच्या आमदारांना घेऊन पक्ष संघटना गोव्यात बळकट होणार नाही, असे काही पदाधिकार्‍यांनी सांगितले. गोव्यातील लहान-मोठे प्रश्न हाती घेऊन पक्षाने आंदोलने करण्याची गरज आहे; पण आमचा पक्ष ते काम करत नाही. केंद्रातील यूपीए सरकारने स्वयंपाक गॅसच्या विषयांसह अनेकबाबतीत लोकविरोधी निर्णय घेतल्यानेही आम्ही मार खाल्ला, असे काही पदाधिकारी म्हणाले. काही आमदार फक्त सत्तेतच राहू पाहतात. आता लोकसभा निवडणुकीचा निकाल विरोधात गेल्यानंतर काही आमदार अस्वस्थ व हवालदिल झाले आहेत. (खास प्रतिनिधी)