शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

पर्रीकर सरकारवर काँग्रेसचे आरोपपत्र

By admin | Updated: June 27, 2014 01:36 IST

पणजी : येत्या २२ जुलै रोजी विधानसभा अधिवेशनास आरंभ होत असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस पक्ष राज्यातील पर्रीकर सरकारविरुद्ध आरोपपत्र सभापतींना

पणजी : येत्या २२ जुलै रोजी विधानसभा अधिवेशनास आरंभ होत असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस पक्ष राज्यातील पर्रीकर सरकारविरुद्ध आरोपपत्र सभापतींना आणि राज्यपालांनाही सादर करील, असे काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक आणि गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी गुरुवारी काँग्रेस हाउसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, खासदार अ‍ॅड. शांताराम नाईक, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव चेल्लाकुमार यांच्या उपस्थितीत बोलताना सिंग म्हणाले की, येत्या सप्टेंबरमध्ये भाजप सरकार आपल्या कारकिर्र्दीचा पन्नास टक्के काळ पूर्ण करत आहे. वीज क्षेत्रातील विद्यमान सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे गोमंतकीय जनता हैराण झाली आहे. वीज समस्या हा गंभीर विषय झालेला आहे. याविरुद्ध काँग्रेस पक्ष आवाज उठवील. विरोधी पक्षनेत्यांकडून सरकारविरुद्ध तपशीलवार आरोपपत्रही सादर केले जाईल. आंदोलनात्मक कार्यक्रमही होतील. यावेळच्या अधिवेशनात काँग्रेसचे आमदार अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळतील. दिग्विजय सिंग म्हणाले की, येत्या दि. १ आॅक्टोबरपासून काँग्रेसची व्यापक जनसंपर्क मोहीम सुरू होईल. दि. ३१ डिसेंबरपर्यंत ही मोहीम चालेल. प्रत्येक मतदान केंद्राच्या कक्षेतील लोकांची भेट घेतली जाईल व सदस्य नोंदणी मोहीम राबविली जाईल. गद्दारांविरुद्ध कारवाई होणार लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधील ज्या व्यक्तींनी पक्षाविरुद्ध कारवाया केल्या, त्यांच्याविरुद्ध निश्चितच कारवाई केली जाईल, असे सिंग यांनी एका प्रश्नादाखल सांगितले. आम्ही कारवाईसाठी समिती नेमली आहे. पक्षाविरुद्ध ज्यांना हाकलायचे आहे, त्यांच्याबाबतची शिफारस प्रदेश काँग्रेस समितीकडून पक्षश्रेष्ठींकडे केली जाईल, असे ते म्हणाले. सिंग हे गुरुवारी दुपारी गोव्यात दाखल झाले असून सायंकाळी त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीवेळी मार्र्गदर्शन केले. आज ते म्हापसा येथील हॉटेल मयुरामध्ये प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीवेळी मार्र्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, अच्छे दिन आणण्याच्या गोष्टी करत मोदी सरकारने देशावर मोठी रेल्वे तिकीट वाढ लादली आहे, असे सिंग म्हणाले. देशभरातील राज्यपालांना हटविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने उतावीळपणा दाखविण्याची गरज नव्हती. ज्या राज्यपालांची मुदत संपली आहे, त्यांना बदलायला हवे होते पण ज्यांची मुदत संपलेली नाही, त्यांची मुदत संपेपर्यंत गृह मंत्रालयाने थांबायला हवे होते, असे दिग्वीजय सिंग पत्रकारांच्या एका प्रश्नास उत्तर देताना म्हणाले. (खास प्रतिनिधी)