शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
2
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
7
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
8
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
9
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
10
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
11
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
12
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
13
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
14
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
15
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
16
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
17
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
18
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
19
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
20
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."

पर्रीकर सरकारवर काँग्रेसचे आरोपपत्र

By admin | Updated: June 27, 2014 01:36 IST

पणजी : येत्या २२ जुलै रोजी विधानसभा अधिवेशनास आरंभ होत असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस पक्ष राज्यातील पर्रीकर सरकारविरुद्ध आरोपपत्र सभापतींना

पणजी : येत्या २२ जुलै रोजी विधानसभा अधिवेशनास आरंभ होत असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस पक्ष राज्यातील पर्रीकर सरकारविरुद्ध आरोपपत्र सभापतींना आणि राज्यपालांनाही सादर करील, असे काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक आणि गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी गुरुवारी काँग्रेस हाउसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, खासदार अ‍ॅड. शांताराम नाईक, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव चेल्लाकुमार यांच्या उपस्थितीत बोलताना सिंग म्हणाले की, येत्या सप्टेंबरमध्ये भाजप सरकार आपल्या कारकिर्र्दीचा पन्नास टक्के काळ पूर्ण करत आहे. वीज क्षेत्रातील विद्यमान सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे गोमंतकीय जनता हैराण झाली आहे. वीज समस्या हा गंभीर विषय झालेला आहे. याविरुद्ध काँग्रेस पक्ष आवाज उठवील. विरोधी पक्षनेत्यांकडून सरकारविरुद्ध तपशीलवार आरोपपत्रही सादर केले जाईल. आंदोलनात्मक कार्यक्रमही होतील. यावेळच्या अधिवेशनात काँग्रेसचे आमदार अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळतील. दिग्विजय सिंग म्हणाले की, येत्या दि. १ आॅक्टोबरपासून काँग्रेसची व्यापक जनसंपर्क मोहीम सुरू होईल. दि. ३१ डिसेंबरपर्यंत ही मोहीम चालेल. प्रत्येक मतदान केंद्राच्या कक्षेतील लोकांची भेट घेतली जाईल व सदस्य नोंदणी मोहीम राबविली जाईल. गद्दारांविरुद्ध कारवाई होणार लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधील ज्या व्यक्तींनी पक्षाविरुद्ध कारवाया केल्या, त्यांच्याविरुद्ध निश्चितच कारवाई केली जाईल, असे सिंग यांनी एका प्रश्नादाखल सांगितले. आम्ही कारवाईसाठी समिती नेमली आहे. पक्षाविरुद्ध ज्यांना हाकलायचे आहे, त्यांच्याबाबतची शिफारस प्रदेश काँग्रेस समितीकडून पक्षश्रेष्ठींकडे केली जाईल, असे ते म्हणाले. सिंग हे गुरुवारी दुपारी गोव्यात दाखल झाले असून सायंकाळी त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीवेळी मार्र्गदर्शन केले. आज ते म्हापसा येथील हॉटेल मयुरामध्ये प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीवेळी मार्र्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, अच्छे दिन आणण्याच्या गोष्टी करत मोदी सरकारने देशावर मोठी रेल्वे तिकीट वाढ लादली आहे, असे सिंग म्हणाले. देशभरातील राज्यपालांना हटविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने उतावीळपणा दाखविण्याची गरज नव्हती. ज्या राज्यपालांची मुदत संपली आहे, त्यांना बदलायला हवे होते पण ज्यांची मुदत संपलेली नाही, त्यांची मुदत संपेपर्यंत गृह मंत्रालयाने थांबायला हवे होते, असे दिग्वीजय सिंग पत्रकारांच्या एका प्रश्नास उत्तर देताना म्हणाले. (खास प्रतिनिधी)